एमएसईबीची निष्क्रियता व भ्रष्टाचाराचा भार ग्राहकांच्या
माथी कशासाठी ?
१५ मार्च
हा जागतिक ग्राहक दिन . या ग्राहकदिनाच्या
निमित्ताने एमएसईबीच्या
ग्राहकांची होणारी लुबाडणुकीवर प्रकाशझोत
टाकण्यासाठी हा संदेश
.
वर्तमान पत्रातून प्रकाशित
झालेल्या वृत्तानुसार एमएसईबी राज्यातील
वीजग्राहकांवर पुन्हा भार " टाकणार आहे . राज्यातील महावितरणच्या ग्राहकांवर
मार्च महिन्यात पुन्हा
एकदा इंधन समायोजन
आकारापोटी वाढीव बिलाचा भार
पडणार आहे . हा
भार वीजवापरानुसार रुपये
६१ ते ६८५
असणार आहे .
एमएसईबी
चे वीज दर
हे वापरानुसार ठरलेले
आहेत . १०० युनिटपर्यंत
वीजवापर करणाऱ्यांसाठी प्रति युनिट दर
हा रु . ३.
०५ , १०१ ते
३०० युनिट पर्यंत
वीजवापर करणाऱ्यासाठी हा दर
६.९५ तर
पुढील ५०० युनिट
,१००० युनिट व
हजार युनिटपेक्षा अधिक
वापरासाठी चे दार
हे अनुक्रमे रु . ९.
९० , रु . ११.५० , रु.
१२. ५० असे
आहेत . म्हणजे एखाद्याने ७५
युनिट वीज वापर
केला तर त्यास
साधारणपणे रु . २३०
व अधिकचा स्थिर
आकार ९० रु.
म्हणजे ३२० रु
. वीजबिल असायला हवे . पण
प्रत्यक्षात हे बिल
रु . ९०० चे
पुढे असते .
वीज
बिलाच्या पाठीमागे दिलेले विवरण
नीटपणे पाहिल्यास आपल्या लक्षात
येईल की , यात
वहन आकार, इंधन
समायोजन आकार , वीज शुल्क असे
विविध कर आकारले
जाताना दिसतात . एमएसईबीचे कुठलेही
बिल पाहिले की , प्रत्येक
वेळेला प्रत्यक्ष वीज वापर
व त्याचा दर या
व्यतिरिक्त विविध गोष्टींचा आकार
लावलेला असतो . अगदी वीजचोरी
मुळे होणाऱ्या वीजगळतीचा
समायोजन भार देखील
ग्राहकांच्या माथी मारला
जातो .
प्रश्न
हा आहे की
, एकदा प्रति युनिट वीजवापराचे
दर ठरल्यानंतर विविध
कर लावण्याचे प्रयोजन
काय ? वीज गळती
२१ टक्के आहे
यास जबाबदार बीज
मंडळ असताना गळतीचा
भर ग्राहकांच्या माथी
मारणे कितपत न्यायपूर्ण
ठरते ?
*राज्यात
व देशात बरेच
शी ग्राहकमंच आहेत
. दुकानदाराने प्लॅस्टिकच्या पिशवीसाठी २/५ रु. आकारले
म्हणून असा ग्राहक
मंचाने दंड देखील
ठोठावलेले आहेत . पण एमएसईबी
कडून खुलेआमपणे केल्या
जाणाऱ्या लुटीबाबत ग्राहक मंच
, प्रसारमाध्यमे , सरकारी यंत्रणा गप्प
का हा मात्र
अनुत्तरीत प्रश्न आहे* .
विविध
यंत्रणातील भ्रष्टाचार -गैरप्रकारांवर अंकुश
आलेला असला तरी
आज ही एमएसईबीचा
कारभार हा गैरप्रकार
व भ्रष्टाचाराने बरबटलेला
आहे . टेबलाखालून व्यवहार
केल्याशिवाय नवीन कनेक्शन
मिळणे केवळ आणि
केवळ दुरापास्तच आहे
. स्थानिक लाईनमन , कनिष्ठ -वरिष्ठ
अभियंता व ग्राहक
यांच्यातली 'अर्थपूर्ण ' संबंधामुळे अगदी
पिठाच्या गिरणीपासून ते विविध
लहान -मोठ्या उद्योगात
सर्रासपणे चोरीची वीज वापरली
जाते . कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम
असला , अगदी लग्न
असले तरी सर्रासपणे
एमएसईबीच्या डीपीतून वीज घेतली
जाते . हा प्रकार
केवळ ग्रामीण भागात
चालतो हा गैरसमज
असून अगदी नवी
मुंबईतील प्रमुख ठिकाणी सार्वजनिक
ठिकाणी वीजचोरी उघडपणे केली
जाते .
एवढेच
कशाला अनेक लोकप्रतिनिधी-उद्योजक , बडे प्रस्थ
हे आपल्या
बंगल्यात सर्रासपणे वीजचोरी करताना
दिसतात . ३/४ रूममध्ये
एसी , ५/६ रुममध्ये , बंगल्याच्या आवारात
विजेचा लखलखाट असून देखील
त्यांचे बिल २/३ हजाराच्या
आत असते तर
दुसरीकडे २/३
बल्बस , टीव्ही -फ्रिज असणाऱ्या
ग्राहकांचे बिल देखील
दीड -दोन हजार
असते . याचे प्रमुख
कारण म्हणजे समायोजनाच्या
नावाखाली वीज चोरीचा
भार सामान्य ग्राहकांच्या
माथी मारला जातो
.
ग्रामीण
भागात ५०० घरापैकी
६० ते ७०
टक्के ग्राहक हे
एकतर आकडे टाकून
वीज घेतात किंवा
अधिकृत कनेक्शन असले तरी
बिल भरतच नाहीत
. स्थानिक लाईनमन महिन्याला ५०/१०० रु
. घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात
. काही मंडळी आपल्या पदाचा
धाक , दांडगाई करत
वीज मोफत वापरतात
. हे सर्व ग्रामसेवकापासून
थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण
जाणतात . वीज चोरी
, विजेचा अनधिकृत उघड वापर
यावर सुयोग्य कारवाई
करण्याचे सोडून एमएसईबी प्रशासन
वीज गळतीच्या नावाने
हा अधिभार 'प्रामाणिक
ग्राहकांच्या ' माथी मारते
. हि एकप्रकारे शासकीय
यंत्रणेने प्रामणिकेतेची दिलेली शिक्षाच म्हणावी
लागेल . एमएसईबी वीज वापराच्या
बाबतीत "प्रामाणिकता " हा दुर्गुण
ठरताना दिसतो आहे .
महाराष्ट्र
सरकार वीज मंडळाचा
कारभार सुधारण्याचे सोडून आता
दिल्ली सरकारच्या धर्तीवर मोफत
वीज देण्याचा विचार
करत आहे . महाराष्ट्र
सरकारने दिल्ली सरकारचे केवळ
अंधानुकरण न करता
दिल्ली मधील वीज
बिल आकार व
महाराष्ट्रातील वीज बिल
आकार याचा तुलनातम्क
अभ्यास करून "मोफत बिलाचे
" आमिष दाखवण्यापेक्षा "माफक दरात
" वीज कशी देता
येईल यास प्राधान्य
द्यावे . जगात कोणीच
कोणाला मोफत काहीच
देत नसते , अन्य
कुठल्या नी कुठल्या
मार्गाने त्याची वसुली होतच
असते .
दिल्ली
सरकारने १०० युनिट
मोफत देण्याआधी 'स्मार्ट
गव्हर्नस ' उपक्रम राबवलेला आहे
. ऊर्जा सुधारणांना प्राधान्य देऊन
सलग ५ वर्षे
नियोजनबद्ध कार्य्रक्रम आखला व
त्याचे रिझल्ट दिसल्यावरच मोफत
विजेचा उपक्रम अंमलात आणला
. आता महाराष्ट्र शासन
जरी १०० युनिट
पर्यंत मोफत वीज
देण्याची योजना राबवण्याचा विचार
करत असले तरी
आजही आपल्याकडे ग्रामीण
भागात व शहरांच्या
काही भागात 'अनधिकृत
'पणे मोफत वीज
वापर योजना 'चालू'च आहे
. दिल्लीमध्ये २०० युनिटसाठी
रु . ६२२ , ३००
युनिटसाठी रु . ९७१
, ४०० युनिटला १३२०
रुपये आकारले जातात
. महाराष्ट्रात
मात्र याच्या ३
पट दर आहेत
. याचे प्रमुख कारण म्हणजे
वीज वितरण व
वहन मधील तूट
, वीजचोरी
, प्रशासकीय भ्रष्टाचार. याची
शिक्षा मात्र ग्राहकाला दिली
जात आहे .
प्रश्न
हा आहे की
, दिल्ली सरकारचेच महाराष्ट्र सरकार
अनुकरण करणार असेल तर
मग केवळ १००
युनिटपर्यंत मोफत वीज
असे अर्धवट अनुकरण
न करता दिल्लीच्या
संपूर्ण वीज बिल
प्रक्रियेचेच अनुकरण करायला हवे
. असे केले तरच
वीज वापर करणाऱ्या प्रामाणिक
ग्राहकांना न्याय दिल्यासारखे होईल
. दिल्ली
सरकारला जे वीज
दर देणे शक्य
होते ते महाराष्ट्र
सरकारला देखील अशक्य असत
नाही . प्रश्न आहे तो
राजकीय -प्रशासकीय इच्छाशक्तीचा . सरकारने
मोफत विजेचा उपक्रम
राबवण्यापेक्षा एमएसईबीचा कारभार अधिकाधिक
सक्षम , भ्रष्टाचार विरहित होईल
यासाठी पाऊले उचलत ग्राहकांना
माफक दरात व अखंड
वीज मिळेल यासाठी
आवश्यक तातडीने पाऊले उचलावीत
.
१५
मार्च हा जागतिक
ग्राहक दिन म्हणून
साजरा केला जातो
. या ग्राहक दिनाच्या
निमित्ताने देशातील विविध ग्राहक
मंचाने वीज बिलाबाबत
ग्राहक हक्काचे उलंघन होणार
नाहीत अशा प्रकारची
पाऊले उचलणे आवश्यक
आहे .प्रतिवर्षी प्रमाणे केवळ
" ग्राहक दिनाचा सोपस्कार " पार
पाडला जाणार असेल
तर ग्राहकांची अवस्था
'दीन'च राहणार
हे नक्की . वीज
वितरण व पुरवठा
हा व्यवसाय आहे
व व्यवसाय करणाऱ्यांच्या
निष्क्रियतेचा भार ग्राहकांवर
कशासाठी ? हा खरा
जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने
वीज ग्राहकांचा प्रश्न
आहे .
सुधीर
लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी
मुंबई .
(लेखक
विविध विषयांचे अभ्यासक
आहेत )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा