THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १४ मार्च, २०२०

माफक दरात वीज या “ग्राहक हक्का”ची पूर्तता व्हायला हवी ..




एमएसईबीची निष्क्रियता  भ्रष्टाचाराचा  भार  ग्राहकांच्या माथी कशासाठी ? 



  १५  मार्च हा जागतिक ग्राहक दिन . या ग्राहकदिनाच्या निमित्ताने  एमएसईबीच्या ग्राहकांची होणारी लुबाडणुकीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी हा संदेश .

         वर्तमान पत्रातून प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार एमएसईबी राज्यातील वीजग्राहकांवर पुन्हा भार  " टाकणार आहे .  राज्यातील महावितरणच्या ग्राहकांवर मार्च महिन्यात पुन्हा एकदा इंधन समायोजन आकारापोटी वाढीव बिलाचा भार पडणार आहे . हा भार वीजवापरानुसार रुपये ६१ ते ६८५ असणार आहे .
एमएसईबी चे वीज दर हे वापरानुसार ठरलेले आहेत . १०० युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्यांसाठी प्रति युनिट दर हा रु . ०५ , १०१ ते ३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्यासाठी हा दर .९५ तर पुढील ५०० युनिट ,१००० युनिट  हजार युनिटपेक्षा अधिक वापरासाठी चे दार हे अनुक्रमे  रु . ९० , रु . ११.५० , रु१२५० असे आहेत . म्हणजे एखाद्याने ७५ युनिट वीज वापर केला तर त्यास साधारणपणे रु . २३०  अधिकचा स्थिर आकार ९० रुम्हणजे ३२० रु . वीजबिल असायला हवे . पण प्रत्यक्षात हे बिल रु . ९०० चे पुढे असते . 

      वीज बिलाच्या पाठीमागे दिलेले विवरण नीटपणे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की , यात वहन आकारइंधन समायोजन आकार , वीज शुल्क  असे विविध कर आकारले जाताना दिसतात . एमएसईबीचे कुठलेही बिल पाहिले की  , प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष वीज वापर  त्याचा दर  या व्यतिरिक्त विविध गोष्टींचा आकार लावलेला असतो . अगदी वीजचोरी मुळे होणाऱ्या वीजगळतीचा समायोजन भार देखील ग्राहकांच्या माथी मारला जातो .
     प्रश्न हा आहे की , एकदा प्रति युनिट वीजवापराचे दर ठरल्यानंतर विविध कर लावण्याचे प्रयोजन काय ? वीज गळती २१ टक्के आहे यास जबाबदार बीज मंडळ असताना गळतीचा भर ग्राहकांच्या माथी मारणे कितपत न्यायपूर्ण ठरते ?

*राज्यात  देशात बरेच शी ग्राहकमंच आहेत . दुकानदाराने प्लॅस्टिकच्या पिशवीसाठी / रुआकारले म्हणून असा ग्राहक मंचाने दंड देखील ठोठावलेले आहेत . पण  एमएसईबी कडून खुलेआमपणे केल्या जाणाऱ्या लुटीबाबत ग्राहक मंच , प्रसारमाध्यमे , सरकारी यंत्रणा गप्प का हा मात्र अनुत्तरीत प्रश्न आहे* .

            विविध यंत्रणातील भ्रष्टाचार -गैरप्रकारांवर अंकुश आलेला असला तरी आज ही एमएसईबीचा कारभार हा गैरप्रकार  भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे . टेबलाखालून व्यवहार केल्याशिवाय नवीन कनेक्शन मिळणे केवळ आणि केवळ दुरापास्तच आहे . स्थानिक लाईनमन , कनिष्ठ -वरिष्ठ अभियंता  ग्राहक यांच्यातली 'अर्थपूर्ण ' संबंधामुळे अगदी पिठाच्या गिरणीपासून ते विविध लहान -मोठ्या उद्योगात सर्रासपणे चोरीची वीज वापरली जाते . कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असला , अगदी लग्न असले तरी सर्रासपणे एमएसईबीच्या डीपीतून वीज घेतली जाते . हा प्रकार केवळ ग्रामीण भागात चालतो हा गैरसमज असून अगदी नवी मुंबईतील प्रमुख ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी वीजचोरी उघडपणे केली जाते .

         एवढेच कशाला अनेक लोकप्रतिनिधी-उद्योजक , बडे प्रस्थ हे  आपल्या बंगल्यात सर्रासपणे वीजचोरी करताना दिसतात  . / रूममध्ये एसी , / रुममध्ये , बंगल्याच्या आवारात विजेचा लखलखाट असून देखील त्यांचे बिल / हजाराच्या आत असते तर दुसरीकडे / बल्बस , टीव्ही -फ्रिज असणाऱ्या ग्राहकांचे बिल देखील दीड -दोन हजार असते . याचे प्रमुख कारण म्हणजे समायोजनाच्या नावाखाली वीज चोरीचा भार सामान्य ग्राहकांच्या माथी मारला जातो .

    ग्रामीण भागात ५०० घरापैकी ६० ते ७० टक्के ग्राहक हे एकतर आकडे टाकून वीज घेतात किंवा अधिकृत कनेक्शन असले तरी बिल भरतच नाहीत . स्थानिक लाईनमन महिन्याला ५०/१०० रु . घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात . काही मंडळी आपल्या पदाचा धाक , दांडगाई करत वीज मोफत वापरतात . हे सर्व ग्रामसेवकापासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण जाणतात . वीज चोरी , विजेचा अनधिकृत उघड वापर यावर सुयोग्य कारवाई करण्याचे सोडून एमएसईबी प्रशासन वीज गळतीच्या नावाने हा अधिभार 'प्रामाणिक ग्राहकांच्या ' माथी मारते . हि एकप्रकारे शासकीय यंत्रणेने प्रामणिकेतेची दिलेली शिक्षाच म्हणावी लागेल . एमएसईबी वीज वापराच्या बाबतीत "प्रामाणिकता " हा दुर्गुण ठरताना दिसतो आहे .

       महाराष्ट्र सरकार वीज मंडळाचा कारभार सुधारण्याचे सोडून आता दिल्ली सरकारच्या धर्तीवर मोफत वीज देण्याचा विचार करत आहे . महाराष्ट्र सरकारने दिल्ली सरकारचे केवळ अंधानुकरण  करता दिल्ली मधील वीज बिल आकार  महाराष्ट्रातील वीज बिल आकार याचा तुलनातम्क अभ्यास करून "मोफत बिलाचे " आमिष दाखवण्यापेक्षा "माफक दरात " वीज कशी देता येईल यास प्राधान्य द्यावे . जगात कोणीच कोणाला मोफत काहीच देत नसते , अन्य कुठल्या नी कुठल्या मार्गाने त्याची वसुली होतच असते .

        दिल्ली सरकारने १०० युनिट मोफत देण्याआधी 'स्मार्ट गव्हर्नस ' उपक्रम राबवलेला आहे . ऊर्जा सुधारणांना प्राधान्य देऊन सलग  वर्षे नियोजनबद्ध कार्य्रक्रम आखला  त्याचे रिझल्ट दिसल्यावरच मोफत विजेचा उपक्रम अंमलात आणला . आता महाराष्ट्र शासन जरी १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची योजना राबवण्याचा विचार करत असले तरी आजही आपल्याकडे ग्रामीण भागात  शहरांच्या काही भागात 'अनधिकृत 'पणे मोफत वीज वापर योजना 'चालू' आहे . दिल्लीमध्ये २०० युनिटसाठी रु . ६२२ , ३०० युनिटसाठी रु . ९७१ , ४०० युनिटला १३२० रुपये आकारले जातात .  महाराष्ट्रात मात्र याच्या  पट दर आहेत . याचे प्रमुख कारण म्हणजे वीज वितरण  वहन मधील तूट ,  वीजचोरी , प्रशासकीय भ्रष्टाचार.  याची शिक्षा मात्र ग्राहकाला दिली जात आहे .

        प्रश्न हा आहे की , दिल्ली सरकारचेच महाराष्ट्र सरकार अनुकरण करणार असेल तर मग केवळ १०० युनिटपर्यंत मोफत वीज असे अर्धवट अनुकरण  करता दिल्लीच्या संपूर्ण वीज बिल प्रक्रियेचेच अनुकरण करायला हवे . असे केले तरच वीज वापर करणाऱ्या  प्रामाणिक ग्राहकांना न्याय दिल्यासारखे होईल .  दिल्ली सरकारला जे वीज दर देणे शक्य होते ते महाराष्ट्र सरकारला देखील अशक्य असत नाही . प्रश्न आहे तो राजकीय -प्रशासकीय इच्छाशक्तीचा . सरकारने मोफत विजेचा उपक्रम राबवण्यापेक्षा एमएसईबीचा कारभार अधिकाधिक सक्षम , भ्रष्टाचार विरहित होईल यासाठी पाऊले उचलत ग्राहकांना माफक दरात   अखंड वीज मिळेल यासाठी आवश्यक तातडीने पाऊले उचलावीत .


         १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो . या ग्राहक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध ग्राहक मंचाने वीज बिलाबाबत ग्राहक हक्काचे उलंघन होणार नाहीत अशा प्रकारची पाऊले उचलणे आवश्यक आहे .प्रतिवर्षी प्रमाणे  केवळ " ग्राहक दिनाचा सोपस्कार " पार पाडला जाणार असेल तर ग्राहकांची अवस्था 'दीन' राहणार हे नक्की . वीज वितरण  पुरवठा हा व्यवसाय आहे  व्यवसाय करणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा भार ग्राहकांवर कशासाठी ? हा खरा जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने वीज ग्राहकांचा प्रश्न आहे .

   
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई . 
(लेखक विविध विषयांचे अभ्यासक आहेत )



प्रतिक्रियेसाठी भ्र:  ९००४६१६२७२  mail : danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा