THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ११ जून, २०२५

अधिकृत भ्रष्टाचाराला "सर्वोच्च " चपराक !

                 सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर एमएमआरडीए ला   ठाणे घोडबंदर  बोगदा उन्नत मार्गाची निविदा पारदर्शकतेसाठी लोकहितासाठी रद्द करण्याची उपरती झालेली आहे 

              एमएमआरडीएची माघार म्हणजे   भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभाराच्या उक्ती विसंगत कृती करणाऱ्या सरकारला आणि एमएमआरडीएला हि सर्वोच्च चपराकच ठरते . मा . उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवता मा . सर्वोच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या एमएमआरडीएला चपराक लगावत तब्बल हजार रुपयांनी कंत्राटाची रक्कम करण्यास भाग पाडले यासाठी मा . सर्वोच्च न्यायालयाचे करदात्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन आणि आभार

            भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून  २०१४ नंतर  'नव भारताचा ' उदय करण्यासाठी आलेले  केंद्र सरकार असो की  भ्रष्टचाराचे आम्हीच कर्दनकाळ असे सांगत "मी पुन्हा येईन " याची आश्वासनपूर्ती  करणारे सरकार असो , यांच्या उक्ती आणि कृतीत फार मोठी विसंगती आहे हे एव्हाना अनेक प्रकरणांतून सुस्पष्ट झालेले आहे

         ठाणे -भाईंदर बोगदा उन्नत मार्गाची निविदेत  संपूर्ण जगभर गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा नावलौकिक असणाऱ्या एल अँड टी ला अपात्र ठरविण्याचा प्रकार हा एमएमआरडीए च्या आणि सरकारच्या 'हेतू ' वरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे .  सरकारी टेंडर आणि त्यासाठी  कंपन्यांना असणारी आवश्यक पात्रता यात नेमका कोणता 'बॉण्ड ' महत्वाचा असतो हे निवडणूक रोखे प्रकरणातून सिद्ध झालेलेच आहे .

    

               जर एल अँड टी ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असती तर सदरील प्रकल्प    हा तब्बल ' हजार कोटी ' अधिकचे देऊनच बिनदिक्कतपणे बिनभोभाटपणे पूर्णत्वास गेला असता .   अलीकडच्या काळात राज्य  केंद्र सरकारचे धोरण हे भ्रष्टचाराला "अधिकृत " कवचकुंडले देण्याचे दिसते .मुळातच विकासकामांचे कंत्राटे हि  " मोठ्या प्रमाणावर रक्कम फुगवून " द्यायचे . सरकारच्या दृष्टीने "पात्र " असणाऱ्या कंपन्यांना अशी कंत्राटे देऊन त्यातील फुगवलेली रक्कम आपल्या पदरात पाडून घेत "सबका साथ ,सबका विकास " या घोषणेची कृतियुक्त पूर्तता करायची . राज्य सरकरचे "डीएसआर रेट " हे  प्रत्यक्ष बाजारातील रेटच्या काही पटीने अधिक ठेवण्याचा प्रकार हा 'अधिकृत ' भ्रष्टचाराचाच एक प्रकार ठरतो .

  

             सर्वात महत्वाचा प्रश्न हा  आहे की  एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांनी जी निविदा मेघा इंजिनियरिंग कंपनीला दिली होती ती आता एल अँड टी या कंपनीला द्यायची वेळ आल्यावर  हजार कोटींनी निविदा कमी होण्यामागे नेमका कोणता 'अर्थ ' दडलेला आहे ?  एमएमआरडीए  ने रद्द झालेली निविदा काढताना दर सुनिश्चित  करण्यासाठी जे निकष लावलेले होते त्या निकषात आता कोणता इतका आमूलाग्र बदल झाला की थेट हजार कोटींनी निविदा रक्कम ढासळली ? 

                  असो ! भ्रष्टाचाराच्या बाबतीत कितीही कोळसा उगाळला तरी तो काळाच अशा प्रकार आहे .  राज्य केंद्र सरकारने आता तरी किमान भ्रष्टाचार निर्मूलनाचे ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या दृष्टीने  'कृतियुक्त ' पाऊले उचलावीत  . अन्यथा  मतदारांसमोर   अंधश्रद्धेतून बाहेर पडून आगामी निवडणुकांमध्ये   'डोळसपणे '  योग्य ठिकाणी मतदानाचे 'बोट ' टेकवून    सरकारचेच निर्मूलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही .  

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा