THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

प्रशासकीय सुधारणांचा 'कागदी' डंका आणि नागरिकांचा 'विदारक' अनुभव: वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी 'नागरिक फीडबॅक' प्रणाली निकडीचीच !

 

प्रशासकीय सुधारणांचा 'कागदी' डंका आणि नागरिकांचा 'विदारक' अनुभव:  वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी 'नागरिक फीडबॅक' प्रणाली निकडीचीच ! 

       कर्तृत्वाचा डंका पिटत प्रतिमा निर्माण करणे आणि  सरकारी मूल्यमापन आणि नागरिकांचा अनुभवात  टोकाची विसंगती असे प्रकार  अलीकडच्या काळात सरकारचा स्थायीभाव झालेला आहे याची प्रचिती अनेक वेळेला दिसून येते . त्याचे वर्तमानातील उत्तम उदाहरण म्हणजे सरकारचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम . 

               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचे नुकतेच मूल्यमापन करण्यात आले. या अहवालानुसार अनेक शासकीय आस्थापना आणि महानगरपालिकांनी डिजिटल प्रशासनात मोठी झेप घेतल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, सरकारी मूल्यमापन आणि नागरिकांचा प्रत्यक्ष अनुभव यामध्ये आज टोकाची विसंगती दिसून येत आहे. कर्तृत्वाचा डंका पिटत प्रतिमानिर्मिती करणे हा सरकारचा स्थायीभाव झाला असला, तरी जमिनीवरील वास्तव 'भीक नको पण कुत्रा आवर' असेच आहे

          १००  १५० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम राबविल्यानंतर देखील आज ही  ९० टक्के शासकीय कार्यालयात ९० टक्के कर्मचारी -अधिकारी हे "उशिराच येणार आणि लवकरच जाणार "  या सूत्राचा  अवलंब करत कार्यालयीन वेळ शिस्त पालनाचे उल्लंघन करत आहेत . नोकरशाहीच कार्यालयात उपस्थित राहत नसेल तर  प्रशासनात गतिमानता आणि कार्यक्षमता कशी कुठून येणार हा प्रश्न अनुत्तरित आहे .

 

आभासी गतिशीलता आणि प्रत्यक्ष दरी:

राज्य सरकारने १५० दिवसांच्या कार्यक्रमात विविध संस्थांना क्रमांक देऊन गौरव केला. मात्र, गतिशिलतेसाठी अव्वल ठरलेल्या काही महानगरपालिकांमध्ये साध्या जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आजही दोन-तीन महिने लागतात, हे वास्तव नाकारता येत नाही. एकीकडे -गव्हर्नन्सचा डांगोरा पिटला जातो, तर दुसरीकडे नागरिकांना प्रत्येक टप्प्यावर 'कागदी घोडे' नाचवण्याची सक्ती केली जाते. लोकशाहीत जनता हीच खरी मालक आहे, त्यामुळे प्रशासनाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचा अधिकार केवळ सरकारी अहवालांना नसून तो प्रत्यक्ष सेवा घेणाऱ्या नागरिकांना असायला हवा.

 

              डिजीटल प्लॅटफॉर्म वर गतिमानता दाखवण्यासाठी नोकरशाही नागरिकांच्या तक्रारींचे  प्रत्यक्षात निराकरण करता  त्या पोर्टल अँप वरून कम्प्लिट झाल्याचे दाखवत आहेत . हा प्रकार थेट नागरिकांची फसवणूक करणारा ठरतो .

 

-गव्हर्नन्स की 'मोर पेपर' फ्रस्ट्रेशन?

-गव्हर्नन्सचा मुख्य उद्देश 'पेपरलेस' प्रशासन हा आहे. मात्र, प्रत्यक्षात हे केवळ 'मोर पेपर' आणि 'मोर फ्रस्ट्रेशन' ठरत आहे. उदाहरणार्थ, नवी मुंबई महानगरपालिकेत विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही नागरिकांना सर्व कागदपत्रांच्या हार्ड कॉपी, झेरॉक्स आणि फोटो प्रत्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे. जर सर्व सोपस्कार ऑफलाईनच करायचे असतील, तर कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग काय? ही पद्धत -गव्हर्नन्सच्या मूळ तत्त्वालाच तिलांजली देणारी आहे

तसेच, प्रशासकीय संकेतस्थळे 'युजर फ्रेंडली' असण्याऐवजी जाणीवपूर्वक क्लिष्ट ठेवली जातात की काय, अशी शंका येते. तांत्रिक गुंतागुंतीमुळेच 'एजंट राज' फोफावते आणि सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होते. पनवेल महानगरपालिकेसारख्या संस्थांना -गव्हर्नन्समध्ये प्रथम क्रमांक दिला जातो, पण तिथे 'पनवेल कनेक्ट' सारख्या ॲप्सवर तक्रारींचे निवारण करताच त्या केवळ विहित कालावधीत 'क्लोज' (बंद) केल्या जातात. डॅशबोर्डवर 'शून्य प्रलंबितता' दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणे, ही शुद्ध प्रशासकीय फसवणूक आहे.

 

  'डायनॅमिक क्यूआर कोड' आणि 'नागरिक फीडबॅक' प्रणालीचा अवलंब निकडीचा:

प्रशासकीय यंत्रणेच्या मूल्यमापन कार्यप्रणालीत प्रत्यक्ष वापरकर्त्याचा   समावेश नसल्याने या मूल्यांकनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयात 'डायनॅमिक क्यूआर कोड' यंत्रणा लागू करणे.

 

. क्युआर कोड आधारित फीडबॅक: प्रत्येक टेबलावर आणि खिडकीवर क्यूआर कोड असावा. नागरिकांनी तो स्कॅन करताच मोबाईलवर एक साधा फॉर्म उघडेल, ज्यामध्ये कामाचा वेग, कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि पारदर्शकता यांचे रेटिंग देता येईल.

. जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञान: फीडबॅक देणारी व्यक्ती प्रत्यक्ष त्या कार्यालयात उपस्थित आहे याची खात्री या तंत्रज्ञानाद्वारे करता येईल, ज्यामुळे बोगस रेटिंगला आळा बसेल.

. लाईव्ह डॅशबोर्ड: हा सर्व डेटा 'सेंट्रलाइज्ड डॅशबोर्ड'वर सार्वजनिक करावा. कोणत्या विभागाचे रेटिंग किती आहे, हे जनतेला थेट दिसल्यास प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण होईल.

. परफॉर्मन्स लिंक्ड अप्रेझल (PLA): चांगल्या रेटिंगसाठी प्रोत्साहन आणि खराब कामगिरीसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असावी. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि उत्तरदायित्व वाढेल

सुशासनासाठी प्रमुख मागण्या

प्रशासनात खऱ्या अर्थाने सुधारणा करायची असेल, तर केवळ सॉफ्टवेअर बसवून चालणार नाही. खालील बदल तातडीने होणे गरजेचे आहे

·        हार्ड कॉपीची सक्ती बंद व्हावी: एकदा ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष कागदपत्रे मागणे गुन्हा ठरवावा. 

·        त्रयस्थ ऑडिट: -गव्हर्नन्स प्रणालीचे त्रयस्थ संस्थेमार्फत 'न्यूट्रल ऑडिट' व्हावे, जेणेकरून डॅशबोर्डवरील खोटा डेटा उघड होईल. 

·        एआय (AI) चा वापर: सेवा हक्क हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करून विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई व्हावी. 

·        ऑफलाईन पळवाटा बंद करा: इमारत बांधकाम किंवा मोठ्या निविदांशी संबंधित सेवा जाणीवपूर्वक ऑफलाईन ठेवल्या जातात, जेणेकरून भ्रष्टाचाराचे 'फूटप्रिंट्स' उमटणार नाहीत. या सर्व सेवा सक्तीने ऑनलाईन कराव्यात. 

                     -गव्हर्नन्स म्हणजे केवळ तांत्रिक देखावा नव्हे, तर तो नागरिकांना मिळणारे समाधान आहे. जोपर्यंत नागरिकाला "चहापाण्याची पाकिटे" घेऊनच कार्यालयाची पायरी चढावी लागते, तोपर्यंत ही डिजिटल व्यवस्था अपयशीच मानली जाईल. शासनाने तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या अधिकारांसाठी करावा आणि प्रशासनाचे खरे मूल्यमापन जनतेच्या हाती द्यावे, हीच 'सजग' नागरिकांची अपेक्षा आहे.

 

लेखक: सुधीर लक्ष्मीकांत दाणी

(विविध सामाजिक शैक्षणिक विषयांचे अभ्यासक)

संपर्क: ९८६९२२६२७२ | alertcitizensforumnm@gmail.com


बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

सजग नागरिक मंच नवी मुंबईचे नवी मुंबईचे महापौर , उपमहापौर आणि सर्व पक्षीय नागरसेवकांना खुले पत्र

 📩

प्रति, 

सन्माननीय महापौर / उपमहापौर,

आणि सर्वपक्षीय नगरसेवक / नगरसेविका, 

नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई. 


🏙️   विषय : नवी मुंबई महानगरपालिकेच्या संविधानिक व कायदेशीर कर्तव्यांची अंमलबजावणी, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व लोकशाही सहभाग सुनिश्चित करण्याबाबत – नागरिकांच्या वतीने निवेदन. 


📜⚖️   महोदय / महोदया, 


🙏   सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! ✨💐

   या पत्राद्वारे आम्ही 'सजग नागरिक मंचा'च्या वतीने खालील महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडत आहोत, ज्यावर आपण आपल्या कार्यकाळाच्या "श्रीगणेशापासून" ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. 


🚩👣   नवी मुंबई ही नियोजनबद्ध शहर म्हणून देशभरात ओळखली जाते. मात्र अलीकडच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात संविधानिक तरतुदी, लोकशाही मूल्ये व नागरिकांचे मूलभूत अधिकार यांची मोठ्या प्रमाणावर उपेक्षा होत असल्याचे सजग नागरिक मंचाच्या निदर्शनास आले आहे. 

📉🔍   भारतीय संविधानाचा ७४ वा घटनादुरुस्ती कायदा (74th Constitutional Amendment Act) हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी व नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे. दुर्दैवाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीत या घटनादुरुस्तीचा आत्मा प्रत्यक्षात उतरलेला दिसत नाही. 

🏛️📖            खऱ्या अर्थाने लोकशाही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा निवडून आलेला प्रतिनिधी स्वतःला 'मालक' न समजता जनतेचा 'सेवक' समजून संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करतो. 

🤝💼   जनतेच्या मागण्या अशा : 👇  

 १. पारदर्शक प्रशासन आणि वार्षिक प्रशासन अहवाल : 📑 महाराष्ट्र महानगरपालिका कायद्या अन्वये, पालिकेच्या कामकाजाचा 'वार्षिक प्रशासन अहवाल' दरवर्षी सर्व नगरसेवकांना आणि जनतेला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

  गेल्या वर्षात पालिकेने किती खर्च केला, किती उद्दिष्टे गाठली आणि कोणत्या विभागात भ्रष्टाचार झाला, याची माहिती जनतेला मिळावी. वर्तमानात "प्रभागसभा" या नागरिकांच्या मूलभूत संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते आहे. 

🚫                 प्रभागसभा हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून, तो नागरिकांचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. संविधानाच्या ७४ व्या दुरुस्तीप्रमाणे व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रभाग सभा नियमितपणे घेणे बंधनकारक आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेत प्रभाग सभा होत नसल्याचे किंवा केवळ कागदोपत्री होत असल्याचे चित्र आहे. 

📋🔏   परिणामी, नागरिकांचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग नाकारला जात असून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच हरताळ  फासला जातो आहे 

⛈️   उपाययोजना: प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात दर ३ ते ६ महिन्यांनी 'क्षेत्र सभा' (Area Sabha) आयोजित कराव्यात. जिथे नागरिक आपले प्रश्न थेट मांडू शकतील. त्याच बरोबर प्रभागस्तरावरील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण लवकरात लवकर 'नागरिक संवाद' उपक्रम सुरू करावा. 🗣️🤝 


  २. पारदर्शक व सहभागी कारभाराचा अभाव : 

🧐 विकासकामांची निवड, खर्चाचे निर्णय, कंत्राटे देताना नागरिकांचा सहभाग शून्य आहे. कोणती कामे आवश्यक आहेत, कोणती अनावश्यक आहेत, याचा निर्णय थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घेताना दिसतात. यामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. 

💸📉 उपाययोजना: प्रत्येक प्रभागातील प्रस्तावित विकासकामांची यादी प्रभाग सभेत मांडून नागरिकांची मान्यता घेण्यात यावी. ✅   ३. ई-गव्हर्नन्स आणि प्रत्यक्ष नागरिक अनुभवातील दरी : 💻 ऑनलाईन प्रणाली, अ‍ॅप्स, पोर्टल्स यांचा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही कार्यालयांच्या फेऱ्या, विलंब, अनुत्तरित तक्रारी यांचा सामना करावा लागत आहे. 🚶‍♂️⏳   उपाययोजना : ई-गव्हर्नन्स केवळ आकडेवारीपुरती न ठेवता, नागरिकांना प्रत्यक्ष सुलभ व वेळबद्ध सेवा मिळेल यासाठीच्या आवश्यक उपायोजना तातडीने योजण्यासाठीचे निर्देश प्रशासनाला द्यावेत. 🚀 


  ४. अनावश्यक कामांद्वारे सार्वजनिक निधीचा अपव्यय : 

🛑 अत्यावश्यक नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करून सौंदर्यीकरण, पुनरावृत्तीची कामे, अल्प उपयोगाची कामे केली जात आहेत. यामुळे मूलभूत समस्या (पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक) दुर्लक्षित राहत आहेत. आजही नागरिकांना महापालिकेच्या दर्जेदार, आवश्यक तेवढ्या शिक्षकांची नियुक्ती असणाऱ्या शाळा, केवळ नाईलाज नव्हे तर स्वईच्छेने महापालिकेच्या दवाखान्यात जाण्याची ईच्छा होईल असे दर्जेदार व लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक आरोग्य सुविधांच्या उणिवेला सामोरे जावे लागत आहे. 

🏫🏥   उपाययोजना: नागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसार सार्वजनिक शिक्षण व आरोग्य विषयांबाबत विकास आराखडा तयार करण्यात यावा. 

📈🗺️ ५. माहिती अधिकार आणि पारदर्शकतेचा अभाव : 

🔐 गुप्त कारभार पद्धती हि भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरीसाठी पोषक ठरत असल्याने "पारदर्शक कारभार" या लोकशाहीच्या मूलभूत तत्वाला तिलांजली देत नागरिकांनी मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आहे. अनेक वेळा अपूर्ण, दिशाभूल करणारी उत्तरे दिली जातात. 

🌫️   उपाययोजना : RTI, स्व-प्रेरित प्रकटीकरण (Suomoto Disclosure) प्रभावीपणे राबवण्यात यावे. आरटीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते अशी ढाल पुढे करत माहिती अधिकाराचे खच्चीकरण टाळण्यासाठी भविष्यात महापालिकेने सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत आणि त्या अंतर्गत दिली जाणारी माहिती थेट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा. सर्वांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही अशी ढाल पुढे करण्याऐवजी अर्ज ऑफलाईन घेऊन माहिती मात्र थेट संकेतस्थळावरच उपलब्ध होईल असा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. 


🌐📤   ६. पर्यावरण, टेकड्या, मोकळ्या जागांचे संरक्षण : 🌳⛰️ टेकड्या, मोकळ्या जागा, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. प्रशासनाची भूमिका अनेकदा बघ्याची किंवा दुर्लक्ष करणारी असल्याचे दिसते. 

🏗️⚠️   उपाययोजना : पर्यावरण संरक्षणाबाबत कठोर भूमिका घ्यावी व नागरिकांचा सहभाग असलेली समिती स्थापन करावी. 

🌿🛡️   ७. 'आर्थिक विकास' आणि 'सामाजिक न्याय' आराखडा : ⚖️ गटार-रस्ते-फुटपाथ निर्मिती-दुरुस्ती-देखभाल म्हणजे विकास या आजवरच्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या 'व्हिजनला' तिलांजली देत खऱ्या अर्थाने मतदारांना अभिप्रेत विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.              

    भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३-डब्ल्यूप्रमाणे महानगरपालिकेने शहराचा 'आर्थिक विकास' आणि 'सामाजिक न्याय' यासाठीचा आराखडा तयार करणे अनिवार्य आहे. 

📖✨             नवी मुंबईतील ७०% लोकसंख्या ही सेवा क्षेत्र आणि रोजगारावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी पालिकेने रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी धोरणे राबवावीत. केवळ बिल्डरांच्या हिताचे 'डेव्हलपमेंट प्लॅन' (DP) न बनवता, सामान्य माणसाला परवडणारे शिक्षण, आरोग्य आणि निवारा मिळेल असा 'सामाजिक न्याय' आराखडा तयार करावा.

 🏘️🎓   ८. पायाभूत सुविधा आणि लोकसंख्येचे गणित: 

🧮 केवळ स्वार्थ जपण्यासाठी "एफएसआय (FSI)" ची खिरापत न वाटता, एफएसआय वाढवताना त्या प्रमाणात पालिकेकडे वाढीव लोकसंख्येला पुरेल इतके पाणी, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता आहे का? याचा प्राधान्याने विचार करावा.

 💧🛣️     पुढील २० वर्षांचा विचार करून पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करावे. 

⏳🔮९. आरोग्य सेवा: 🚑 लोकसंख्येच्या प्रमाणात दर्जेदार आरोग्य सेवा हा त्या त्या शहराचा कणा असतो हि बाब ध्यानात घेत खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर पालिकेची रुग्णालये सक्षम करावीत, जेणेकरून गरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळतील. शहराच्या आरक्षित जमिनी खासगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे धोरण थांबवावे. 

💉🚫   १०. आर्थिक स्वायत्ता आणि निधीचा विनियोग : 💰 महानगरपालिकेने केवळ राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा. 

🏛️💹   उपाययोजना : नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन केंद्रित न राहता नागरिक केंद्रित व्हावा, हीच सजग नागरिक मंचाची ठाम भूमिका आहे. 


💉🚫११]  कोरोना कालावधीतील खर्चावर श्वेतपत्रीका काढा :  

              आपत्ती म्हणजे लुटीची सुवर्णसंधी अशा दृष्टीकोनातून प्रशासनाने कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या हॉस्पिटलची निर्मिती , क्वारनटाईन केलेल्या नागरिकांसाठी निवासासाठी केलेल्या ठिकाणी वॉशिंगमशीन , बेड ,गाद्या अशा  विविध वस्तूंची बाजारभावापेक्षा दुपट्ट तीपट्ट दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केलेला आहे .  कोरोना कालावधीतील खर्चावर श्वेतपत्रीका काढावी .

त्याचबरोबर , त्या काळात खरेदी केलेल्या वस्तू वर्तमानात कुठे आहेत ,त्याचा पुनर्वापर केला आहे का ? असल्यास कुठे ? केला नसल्यास त्या वस्तू कुजत ठेवण्यापेक्षा बेड ,गाद्या व तत्सम वस्तू वृद्धाश्रम , अनाथालय अशा ठिकाणी दान कराव्यात    

💉🚫१२ ] सर्व उपक्रमांच्या खर्च व फलनिष्पत्ती बाबतचे ऑडिट आवश्यक :  प्रशासकीय राजवटीत मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी  लीडार सर्वेक्षण , पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचे वितरण करण्यासाठी शहरात टाकण्यात आलेल्या पाईप लाईन वरील खर्च अशा सर्व उपक्रमांच्या खर्च व फलनिष्पत्ती बाबतचे ऑडिट करावे व त्याचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर खुला करावा .

 

👥🚩   आपण सर्व नगरसेवक हे केवळ राजकीय प्रतिनिधी नसून संविधानाचे रक्षक व नागरिकांचे विश्वस्त (Trustee) आहात, ही भूमिका कृतीतून दिसावी, हीच अपेक्षा आहे. 

🤝🏛️       सजग नागरिक मंचाच्या वतीने मागणी आहे की, प्रभाग सभा तात्काळ व नियमित सुरू कराव्यात, नागरिक सहभागा शिवाय कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत, पारदर्शक, उत्तरदायी व संविधानिक कारभार सुनिश्चित करावा.

 📢✅   या निवेदनातील मुद्द्यांवर पहिल्याच महासभेत विशेष सर्वपक्षीय चर्चा घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार ज्या करदात्या नागरिकांच्या पैशावर चालतो त्यांच्यासाठी सर्व सभांचे, महासभेचे प्रसारण पब्लिक डोमेनवर खुले केले जावे. 

📺🌐   प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व निर्णयांचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा. 

💻🔍   आपण आम्हा मतदारांना निवडणूक पूर्व काळात "आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी निवडणूक लढवत आहोत आणि जनसेवेची संधी म्हणून आम्हाला मत द्या" असे आश्वासन दिलेले आहे. निवडणुकीत झालेला खर्च वसूल करण्यासाठी पाच वर्षे घालवणे, हा लोकशाहीचा 'तमाशा' ठरेल. आम्हाला अपेक्षा आहे की आपण या तमाशाचा भाग न होता, संविधानाचा आदर करणारे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य कराल. 

🛡️🗳️   आम्ही आपणांस आश्वस्त करतो की, सजग नागरिक म्हणून आम्ही आपल्या चांगल्या कामात सदैव सहकार्य करू, परंतु कर्तव्यात कसूर झाल्यास जाब विचारण्यासही मागे सरणार नाही. 

✊🔥   आपल्या सकारात्मक व तातडीच्या प्रतिसादाची अपेक्षा. 


                                                                                             ⏳🙏     कळावे,   

                                                                                                        आपला विनीत, 

                                                                      🙌   सजग नागरिक मंच, नवी मुंबई 

👥🚩   संपर्क ईमेल : alertcitizensforumnm@gmail.com 📧





मुख्यमंत्री महोदयांना निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे "गुपित खुले पत्र"...

 

📝 मुख्यमंत्री महोदयांना निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे "गुपित खुले पत्र"... 📩

प्रति, मा. देवेंद्र फडणवीस साहेब, 

🏛️ मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

विषय: वर्तमानातील “निवडणूक बाजार तत्वानुसार” केलेली गुंतवणूक लक्षपटीने वसूल करणाऱ्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेस आपला सततचा वरदहस्त ठेवण्याबाबत... 🙏


देवभाऊ नमस्कार! 👋

निवडणुका कशा जिंकायच्या याबाबत भारतीय जनता पक्ष अत्यंत निपुण आहे व त्याचे शिल्पकार आपण आहात हे आता उघड गुपित राहिलेले नाही. 🏆

लोकशाहीची जननी व जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेच्या निवडणूक सूत्रानुसार— "मतदार संघातील एकूण मतदार भागिले २ गुणिले २ ते १० हजार रुपये (प्रति मतदार 'पाकीट मनी')" 💰 अधिक कार्यकर्त्यांच्या दारू, मटण आणि पेट्रोल खर्चासाठी 🍗🍻 आवश्यक पाच-पन्नास लाख अशा सर्व भांडवलाची परिपूर्ण तयारी करून आम्ही रिंगणात उतरलो आणि अपेक्षेप्रमाणे निवडूनही आलो! ✅

आणि हो, एसटीत ज्याप्रमाणे तिकिटासाठी पैसे द्यावेच लागतात, त्याच सूत्रानुसार आम्ही देखील तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये जी ठराविक ‘नजराणा’ देण्याची परंपरा आहे, तीही पूर्ण केली आहे. थोडक्यात, या पाच वर्षांच्या “लोकशाही उद्योगात” आमची गुंतवणूक अत्यंत प्रामाणिक आहे. 📈

आपण जाणता की राजकारण हा समाजसेवेचा भाग ही संकल्पना आता कालबाह्य झाली असून, पॉलिटिक्स म्हणजे "High Risk, Low Investment & Very Very High Return" असा व्यवसाय झाला आहे. 💼✨


💸 आता वेळ वसुलीची... 💸

नगरसेवक म्हणून पाऊल ठेवणे म्हणजेच "निवडणुकीतील गुंतवणुकीचा परतावा वसूल करण्याचा श्रीगणेशा" होय. 🚩 आम्ही आता तातडीने कामाला लागणार आहोत:

  • जुनाच फॉर्म्युला: रस्ते, फुटपाथ, नाले यांची कामे काढणे. 🛣️

  • बिल काढण्याची कला: उद्यानात माती शिंपडून करोडो रुपयांची बिले काढणे, जुनेच स्टोन इकडून तिकडे लावून दोन्ही ठिकाणचे पैसे उचलणे. 🏗️

  • महागाईचा दर: १० हजारांचे बाकडे ३५ हजारांत खरेदी करणे आणि जुन्याच फाईल्स 'कॉपी-पेस्ट' करून नव्या नस्त्या मंजूर करणे. 📋🖊️

काही कंत्राटदारांनी आम्हाला मोठी मदत केली आहे, आता त्यांच्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. 🤝


📢 आमच्या "खास" मागण्या:

1️⃣ केंद्रीय यंत्रणांपासून संरक्षण: 🛡️ आगामी ५ वर्षांत आमची संपत्ती वाढणारच! आयकर विभाग, ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) यांची नजर आमच्यावर पडणार नाही, याची चोख व्यवस्था व्हावी.

 2️⃣ समाजसेवकांचा बंदोबस्त: 🚫 "राष्ट्र प्रथम" (आमच्यासाठी राष्ट्र म्हणजे आम्ही आणि आमचे नातेवाईक) काम करताना अडथळा आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘सरकारी कामात अडथळा’ असे लेबल लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. 

'3️⃣ “लाडक्या आयुक्तांची” नियुक्ती: 👨‍ा टेंडर आणि फाईल्स तातडीने मंजूर करण्यासाठी आमच्या सोयीच्या आयुक्तांचीच नियुक्ती व्हावी.

 4️⃣ भूखंडांचे श्रीखंड: 🍰 ट्रस्ट, शाळा किंवा मंदिराच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी लाटण्याच्या आमच्या फाईल्सना विनासायास मंजुरी मिळावी. 

5️⃣ गुप्त कारभाराला अभय: 🤐 महापालिका तिजोरीची लूट करण्यासाठी कारभार 'गुप्त' असणे आवश्यक आहे. खर्चाचा तपशील पब्लिक डोमेनवर येणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणुका संपल्याने आता नागरिकांच्या मताला काडीचीही किंमत देण्याची गरज नाही. 🔇

 6️⃣ समान निधीवाटप: 💰 राजकीय पक्ष ही संकल्पना आता उरली नाही, त्यामुळे सर्व नगरसेवकांना पक्षभेद न करता समान निधी मिळावा.


निष्कर्ष: 🧐 आपले सरकार “पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त” कारभाराची घोषणा करत असले, तरी वास्तवात आम्हाला आमची गुंतवणूक शांततेत वसूल करता येईल, अशी अदृश्य व्यवस्था आपण जपली आहे. जनतेला ‘गाजर’ दाखवणे 🥕 आणि आम्हाला ‘प्रशासकीय सवलत’ देणे ही कसरत फक्त आपल्यासारखा कुशल लोकनेताच करू शकतो! 🎩✨

"सबका साथ, सबका विकास" (आणि आमचा खास विकास) या सूत्रासाठी आपला वरदहस्त कायम असावा, हीच आग्रहाची विनंती. 🙏

कळावे,

आपले कृपाभिलाषी, सर्वपक्षीय नगरसेवक 🤝 (जनतेचे “तथाकथित” हितचिंतक)

संकल्पना: सुधीर दाणी [भावी नगरसेवक] 📞 9869226272 | 📧 danisudhir@gmail.com

प्रत: माननीय अर्थमंत्री (विशेष 'गुंतवणूक परतावा' निधी देण्याबाबत) 📑💼

संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणाऱ्या "बॅकडोअर पॉलिटिक्स": 'स्वीकृत नगरसेवक' संस्कृतीला चाप हवा! 🏛️

 


🚫 संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणाऱ्या  "बॅकडोअर पॉलिटिक्स": 'स्वीकृत नगरसेवक' संस्कृतीला चाप हवा! 🏛️

भारतीय लोकशाहीत विकेंद्रीकरण आणि सर्वसमावेशकता याला सर्वोच्च स्थान दिले आहे. मात्र, सध्याच्या राजकीय संस्कृतीत संविधानाच्या मूळ हेतूलाच नख लावण्याचे काम 'स्वीकृत नगरसेवक' पदाच्या माध्यमातून सुरू आहे. 📉


🔥 संकल्पना उदात्त, अंमलबजावणी विदारक!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ राजकीय प्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा (Experts) सहभाग असावा, या उद्देशाने ‘स्वीकृत नगरसेवक’ (Nominated Corporators) ही संकल्पना मांडण्यात आली. पण आज महाराष्ट्रात हे चित्र पूर्णतः बदलले आहे:

  • ❌ ही पदे तज्ज्ञांसाठी नसून राजकीय पक्षांच्या 'लाडक्या' कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी राखीव झाली आहेत.

  • ❌ पराभूत उमेदवारांना मागील दाराने (Backdoor) सत्तेत आणण्याचा हा एक मार्ग बनला आहे.

  • ❌ राजकीय निष्ठावंतांच्या सोयीसाठी संविधानाच्या चौकटीलाच मोडीत काढले जात आहे.


📝 काय सांगतो कायदा? (आणि काय घडतंय प्रत्यक्षात?)

महानगरपालिका अधिनियमानुसार, नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या १०% पर्यंत सदस्य ‘स्वीकृत’ करता येतात. यासाठी खालील निकष विहित केलेले आहेत:

क्षेत्रआवश्यक अनुभवसद्यस्थिती ⚠️
अधिवक्ताकिमान ५ वर्षे सरावराजकीय कायदे सल्लागार किंवा निष्ठावंत
निवृत्त अधिकारीपालिकेतील वरिष्ठ पदाचा अनुभवपक्षाशी जवळीक असलेले निवृत्त अधिकारी
सामाजिक कार्यकर्तानोंदणीकृत संस्थेत ५ वर्षे कामपक्षाचे झेंडे वाहणारे कार्यकर्ते
तज्ज्ञवैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षणनावापुरते निकष लावून राजकीय नियुक्त्या

📉 अपात्र नियुक्तीचे शहरावर होणारे परिणाम 🏙️

जेव्हा एखादा स्वयंपाकी 'सुगरण' नसतो, तेव्हा किराणा कितीही दर्जेदार भरला तरी अन्नाची नासाडीच होते. तसेच शहराच्या नियोजनात घडत आहे:

  1. व्हिजनचा अभाव: रस्ते, वाहतूक, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यावर चर्चा करण्यासाठी बुद्धिजीवींची गरज असते, तिथे 'अभ्यासशून्य' व्यक्ती बसल्यामुळे शहराचे नियोजन कोलमडते. 🏗️

  2. अशास्त्रीय निर्णय: DP (विकास आराखडा), स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांबाबतचे निर्णय केवळ राजकीय हिताचे घेतले जातात, शास्त्रीय दृष्टिकोनातून नव्हे. 🌍

  3. लोकभावनेचा अवमान: ज्या व्यक्तीला प्रभागातील जनतेने निवडणुकीत नाकारले, तिला संपूर्ण शहराच्या धोरणावर निर्णय घेण्याचा अधिकार देणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. 🗳️🚫


⚖️ न्यायालयीन हस्तक्षेप आणि सुधारणेची गरज

महाराष्ट्रातील अनेक न्यायालयीन निकालांनी स्पष्ट केले आहे की, “स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत तज्ज्ञतेचा हेतू मोडता कामा नये.” मात्र, राजकीय नेतृत्व याकडे दुर्लक्ष करत आहे.

आमच्या प्रमुख मागण्या:

✅ स्वतंत्र छाननी समिती: स्वीकृत सदस्यांची निवड केवळ राजकीय मर्जीवर न राहता, एका स्वतंत्र समितीमार्फत निकषांच्या आधारे व्हावी. 🧐

✅ स्पष्ट नियमावली: 'तज्ज्ञ' शब्दाचा मनमानी अर्थ लावणाऱ्या प्रशासकीय पळवाटा बंद व्हाव्यात.

✅ सुओमोटो (Suo Motu) याचिका: संविधानाचे रक्षक म्हणून न्यायालयानेच अशा लोकशाहीविरोधी परंपरांना चाप लावण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. 🏛️⚖️


📢 निष्कर्ष

राजकीय सोय म्हणून स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर करणे, हे शहराच्या विकासाचे 'अध:पतन' आहे. जर आपल्याला शहरांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करायचे असेल, तर बुद्धीजीवींना मुख्य प्रवाहात आणावेच लागेल. अन्यथा, ही पदे केवळ "राजकीय पुनर्वसन केंद्रे" म्हणूनच उरतील. 🚩


✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी

प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

📞 ९८६९२२६२७२ | 📧 alertcitizensforumnm@gmail.com



COURTESY  : AI PHOTO