THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

सजग नागरिक मंच नवी मुंबईचे नवी मुंबईचे महापौर , उपमहापौर आणि सर्व पक्षीय नागरसेवकांना खुले पत्र

 📩

प्रति, 

सन्माननीय महापौर / उपमहापौर,

आणि सर्वपक्षीय नगरसेवक / नगरसेविका, 

नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई. 


🏙️   विषय : नवी मुंबई महानगरपालिकेच्या संविधानिक व कायदेशीर कर्तव्यांची अंमलबजावणी, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व लोकशाही सहभाग सुनिश्चित करण्याबाबत – नागरिकांच्या वतीने निवेदन. 


📜⚖️   महोदय / महोदया, 


🙏   सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! ✨💐

   या पत्राद्वारे आम्ही 'सजग नागरिक मंचा'च्या वतीने खालील महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडत आहोत, ज्यावर आपण आपल्या कार्यकाळाच्या "श्रीगणेशापासून" ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. 


🚩👣   नवी मुंबई ही नियोजनबद्ध शहर म्हणून देशभरात ओळखली जाते. मात्र अलीकडच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात संविधानिक तरतुदी, लोकशाही मूल्ये व नागरिकांचे मूलभूत अधिकार यांची मोठ्या प्रमाणावर उपेक्षा होत असल्याचे सजग नागरिक मंचाच्या निदर्शनास आले आहे. 

📉🔍   भारतीय संविधानाचा ७४ वा घटनादुरुस्ती कायदा (74th Constitutional Amendment Act) हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी व नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे. दुर्दैवाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीत या घटनादुरुस्तीचा आत्मा प्रत्यक्षात उतरलेला दिसत नाही. 

🏛️📖            खऱ्या अर्थाने लोकशाही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा निवडून आलेला प्रतिनिधी स्वतःला 'मालक' न समजता जनतेचा 'सेवक' समजून संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करतो. 

🤝💼   जनतेच्या मागण्या अशा : 👇  

 १. पारदर्शक प्रशासन आणि वार्षिक प्रशासन अहवाल : 📑 महाराष्ट्र महानगरपालिका कायद्या अन्वये, पालिकेच्या कामकाजाचा 'वार्षिक प्रशासन अहवाल' दरवर्षी सर्व नगरसेवकांना आणि जनतेला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

  गेल्या वर्षात पालिकेने किती खर्च केला, किती उद्दिष्टे गाठली आणि कोणत्या विभागात भ्रष्टाचार झाला, याची माहिती जनतेला मिळावी. वर्तमानात "प्रभागसभा" या नागरिकांच्या मूलभूत संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते आहे. 

🚫                 प्रभागसभा हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून, तो नागरिकांचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. संविधानाच्या ७४ व्या दुरुस्तीप्रमाणे व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रभाग सभा नियमितपणे घेणे बंधनकारक आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेत प्रभाग सभा होत नसल्याचे किंवा केवळ कागदोपत्री होत असल्याचे चित्र आहे. 

📋🔏   परिणामी, नागरिकांचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग नाकारला जात असून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच हरताळ  फासला जातो आहे 

⛈️   उपाययोजना: प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात दर ३ ते ६ महिन्यांनी 'क्षेत्र सभा' (Area Sabha) आयोजित कराव्यात. जिथे नागरिक आपले प्रश्न थेट मांडू शकतील. त्याच बरोबर प्रभागस्तरावरील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण लवकरात लवकर 'नागरिक संवाद' उपक्रम सुरू करावा. 🗣️🤝 


  २. पारदर्शक व सहभागी कारभाराचा अभाव : 

🧐 विकासकामांची निवड, खर्चाचे निर्णय, कंत्राटे देताना नागरिकांचा सहभाग शून्य आहे. कोणती कामे आवश्यक आहेत, कोणती अनावश्यक आहेत, याचा निर्णय थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घेताना दिसतात. यामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. 

💸📉 उपाययोजना: प्रत्येक प्रभागातील प्रस्तावित विकासकामांची यादी प्रभाग सभेत मांडून नागरिकांची मान्यता घेण्यात यावी. ✅   ३. ई-गव्हर्नन्स आणि प्रत्यक्ष नागरिक अनुभवातील दरी : 💻 ऑनलाईन प्रणाली, अ‍ॅप्स, पोर्टल्स यांचा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही कार्यालयांच्या फेऱ्या, विलंब, अनुत्तरित तक्रारी यांचा सामना करावा लागत आहे. 🚶‍♂️⏳   उपाययोजना : ई-गव्हर्नन्स केवळ आकडेवारीपुरती न ठेवता, नागरिकांना प्रत्यक्ष सुलभ व वेळबद्ध सेवा मिळेल यासाठीच्या आवश्यक उपायोजना तातडीने योजण्यासाठीचे निर्देश प्रशासनाला द्यावेत. 🚀 


  ४. अनावश्यक कामांद्वारे सार्वजनिक निधीचा अपव्यय : 

🛑 अत्यावश्यक नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करून सौंदर्यीकरण, पुनरावृत्तीची कामे, अल्प उपयोगाची कामे केली जात आहेत. यामुळे मूलभूत समस्या (पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक) दुर्लक्षित राहत आहेत. आजही नागरिकांना महापालिकेच्या दर्जेदार, आवश्यक तेवढ्या शिक्षकांची नियुक्ती असणाऱ्या शाळा, केवळ नाईलाज नव्हे तर स्वईच्छेने महापालिकेच्या दवाखान्यात जाण्याची ईच्छा होईल असे दर्जेदार व लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक आरोग्य सुविधांच्या उणिवेला सामोरे जावे लागत आहे. 

🏫🏥   उपाययोजना: नागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसार सार्वजनिक शिक्षण व आरोग्य विषयांबाबत विकास आराखडा तयार करण्यात यावा. 

📈🗺️ ५. माहिती अधिकार आणि पारदर्शकतेचा अभाव : 

🔐 गुप्त कारभार पद्धती हि भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरीसाठी पोषक ठरत असल्याने "पारदर्शक कारभार" या लोकशाहीच्या मूलभूत तत्वाला तिलांजली देत नागरिकांनी मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आहे. अनेक वेळा अपूर्ण, दिशाभूल करणारी उत्तरे दिली जातात. 

🌫️   उपाययोजना : RTI, स्व-प्रेरित प्रकटीकरण (Suomoto Disclosure) प्रभावीपणे राबवण्यात यावे. आरटीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते अशी ढाल पुढे करत माहिती अधिकाराचे खच्चीकरण टाळण्यासाठी भविष्यात महापालिकेने सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत आणि त्या अंतर्गत दिली जाणारी माहिती थेट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा. सर्वांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही अशी ढाल पुढे करण्याऐवजी अर्ज ऑफलाईन घेऊन माहिती मात्र थेट संकेतस्थळावरच उपलब्ध होईल असा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. 


🌐📤   ६. पर्यावरण, टेकड्या, मोकळ्या जागांचे संरक्षण : 🌳⛰️ टेकड्या, मोकळ्या जागा, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. प्रशासनाची भूमिका अनेकदा बघ्याची किंवा दुर्लक्ष करणारी असल्याचे दिसते. 

🏗️⚠️   उपाययोजना : पर्यावरण संरक्षणाबाबत कठोर भूमिका घ्यावी व नागरिकांचा सहभाग असलेली समिती स्थापन करावी. 

🌿🛡️   ७. 'आर्थिक विकास' आणि 'सामाजिक न्याय' आराखडा : ⚖️ गटार-रस्ते-फुटपाथ निर्मिती-दुरुस्ती-देखभाल म्हणजे विकास या आजवरच्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या 'व्हिजनला' तिलांजली देत खऱ्या अर्थाने मतदारांना अभिप्रेत विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.              

    भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३-डब्ल्यूप्रमाणे महानगरपालिकेने शहराचा 'आर्थिक विकास' आणि 'सामाजिक न्याय' यासाठीचा आराखडा तयार करणे अनिवार्य आहे. 

📖✨             नवी मुंबईतील ७०% लोकसंख्या ही सेवा क्षेत्र आणि रोजगारावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी पालिकेने रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी धोरणे राबवावीत. केवळ बिल्डरांच्या हिताचे 'डेव्हलपमेंट प्लॅन' (DP) न बनवता, सामान्य माणसाला परवडणारे शिक्षण, आरोग्य आणि निवारा मिळेल असा 'सामाजिक न्याय' आराखडा तयार करावा.

 🏘️🎓   ८. पायाभूत सुविधा आणि लोकसंख्येचे गणित: 

🧮 केवळ स्वार्थ जपण्यासाठी "एफएसआय (FSI)" ची खिरापत न वाटता, एफएसआय वाढवताना त्या प्रमाणात पालिकेकडे वाढीव लोकसंख्येला पुरेल इतके पाणी, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता आहे का? याचा प्राधान्याने विचार करावा.

 💧🛣️     पुढील २० वर्षांचा विचार करून पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करावे. 

⏳🔮९. आरोग्य सेवा: 🚑 लोकसंख्येच्या प्रमाणात दर्जेदार आरोग्य सेवा हा त्या त्या शहराचा कणा असतो हि बाब ध्यानात घेत खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर पालिकेची रुग्णालये सक्षम करावीत, जेणेकरून गरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळतील. शहराच्या आरक्षित जमिनी खासगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे धोरण थांबवावे. 

💉🚫   १०. आर्थिक स्वायत्ता आणि निधीचा विनियोग : 💰 महानगरपालिकेने केवळ राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा. 

🏛️💹   उपाययोजना : नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन केंद्रित न राहता नागरिक केंद्रित व्हावा, हीच सजग नागरिक मंचाची ठाम भूमिका आहे. 

👥🚩   आपण सर्व नगरसेवक हे केवळ राजकीय प्रतिनिधी नसून संविधानाचे रक्षक व नागरिकांचे विश्वस्त (Trustee) आहात, ही भूमिका कृतीतून दिसावी, हीच अपेक्षा आहे. 

🤝🏛️       सजग नागरिक मंचाच्या वतीने मागणी आहे की, प्रभाग सभा तात्काळ व नियमित सुरू कराव्यात, नागरिक सहभागा शिवाय कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत, पारदर्शक, उत्तरदायी व संविधानिक कारभार सुनिश्चित करावा.

 📢✅   या निवेदनातील मुद्द्यांवर पहिल्याच महासभेत विशेष सर्वपक्षीय चर्चा घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार ज्या करदात्या नागरिकांच्या पैशावर चालतो त्यांच्यासाठी सर्व सभांचे, महासभेचे प्रसारण पब्लिक डोमेनवर खुले केले जावे. 

📺🌐   प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व निर्णयांचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा. 

💻🔍   आपण आम्हा मतदारांना निवडणूक पूर्व काळात "आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी निवडणूक लढवत आहोत आणि जनसेवेची संधी म्हणून आम्हाला मत द्या" असे आश्वासन दिलेले आहे. निवडणुकीत झालेला खर्च वसूल करण्यासाठी पाच वर्षे घालवणे, हा लोकशाहीचा 'तमाशा' ठरेल. आम्हाला अपेक्षा आहे की आपण या तमाशाचा भाग न होता, संविधानाचा आदर करणारे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य कराल. 

🛡️🗳️   आम्ही आपणांस आश्वस्त करतो की, सजग नागरिक म्हणून आम्ही आपल्या चांगल्या कामात सदैव सहकार्य करू, परंतु कर्तव्यात कसूर झाल्यास जाब विचारण्यासही मागे सरणार नाही. 

✊🔥   आपल्या सकारात्मक व तातडीच्या प्रतिसादाची अपेक्षा. 


                                                                                             ⏳🙏     कळावे,   

                                                                                                        आपला विनीत, 

                                                                      🙌   सजग नागरिक मंच, नवी मुंबई 

👥🚩   संपर्क ईमेल : alertcitizensforumnm@gmail.com 📧





मुख्यमंत्री महोदयांना निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे "गुपित खुले पत्र"...

 

📝 मुख्यमंत्री महोदयांना निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे "गुपित खुले पत्र"... 📩

प्रति, मा. देवेंद्र फडणवीस साहेब, 

🏛️ मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

विषय: वर्तमानातील “निवडणूक बाजार तत्वानुसार” केलेली गुंतवणूक लक्षपटीने वसूल करणाऱ्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेस आपला सततचा वरदहस्त ठेवण्याबाबत... 🙏


देवभाऊ नमस्कार! 👋

निवडणुका कशा जिंकायच्या याबाबत भारतीय जनता पक्ष अत्यंत निपुण आहे व त्याचे शिल्पकार आपण आहात हे आता उघड गुपित राहिलेले नाही. 🏆

लोकशाहीची जननी व जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेच्या निवडणूक सूत्रानुसार— "मतदार संघातील एकूण मतदार भागिले २ गुणिले २ ते १० हजार रुपये (प्रति मतदार 'पाकीट मनी')" 💰 अधिक कार्यकर्त्यांच्या दारू, मटण आणि पेट्रोल खर्चासाठी 🍗🍻 आवश्यक पाच-पन्नास लाख अशा सर्व भांडवलाची परिपूर्ण तयारी करून आम्ही रिंगणात उतरलो आणि अपेक्षेप्रमाणे निवडूनही आलो! ✅

आणि हो, एसटीत ज्याप्रमाणे तिकिटासाठी पैसे द्यावेच लागतात, त्याच सूत्रानुसार आम्ही देखील तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये जी ठराविक ‘नजराणा’ देण्याची परंपरा आहे, तीही पूर्ण केली आहे. थोडक्यात, या पाच वर्षांच्या “लोकशाही उद्योगात” आमची गुंतवणूक अत्यंत प्रामाणिक आहे. 📈

आपण जाणता की राजकारण हा समाजसेवेचा भाग ही संकल्पना आता कालबाह्य झाली असून, पॉलिटिक्स म्हणजे "High Risk, Low Investment & Very Very High Return" असा व्यवसाय झाला आहे. 💼✨


💸 आता वेळ वसुलीची... 💸

नगरसेवक म्हणून पाऊल ठेवणे म्हणजेच "निवडणुकीतील गुंतवणुकीचा परतावा वसूल करण्याचा श्रीगणेशा" होय. 🚩 आम्ही आता तातडीने कामाला लागणार आहोत:

  • जुनाच फॉर्म्युला: रस्ते, फुटपाथ, नाले यांची कामे काढणे. 🛣️

  • बिल काढण्याची कला: उद्यानात माती शिंपडून करोडो रुपयांची बिले काढणे, जुनेच स्टोन इकडून तिकडे लावून दोन्ही ठिकाणचे पैसे उचलणे. 🏗️

  • महागाईचा दर: १० हजारांचे बाकडे ३५ हजारांत खरेदी करणे आणि जुन्याच फाईल्स 'कॉपी-पेस्ट' करून नव्या नस्त्या मंजूर करणे. 📋🖊️

काही कंत्राटदारांनी आम्हाला मोठी मदत केली आहे, आता त्यांच्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. 🤝


📢 आमच्या "खास" मागण्या:

1️⃣ केंद्रीय यंत्रणांपासून संरक्षण: 🛡️ आगामी ५ वर्षांत आमची संपत्ती वाढणारच! आयकर विभाग, ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) यांची नजर आमच्यावर पडणार नाही, याची चोख व्यवस्था व्हावी.

 2️⃣ समाजसेवकांचा बंदोबस्त: 🚫 "राष्ट्र प्रथम" (आमच्यासाठी राष्ट्र म्हणजे आम्ही आणि आमचे नातेवाईक) काम करताना अडथळा आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘सरकारी कामात अडथळा’ असे लेबल लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. 

'3️⃣ “लाडक्या आयुक्तांची” नियुक्ती: 👨‍ा टेंडर आणि फाईल्स तातडीने मंजूर करण्यासाठी आमच्या सोयीच्या आयुक्तांचीच नियुक्ती व्हावी.

 4️⃣ भूखंडांचे श्रीखंड: 🍰 ट्रस्ट, शाळा किंवा मंदिराच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी लाटण्याच्या आमच्या फाईल्सना विनासायास मंजुरी मिळावी. 

5️⃣ गुप्त कारभाराला अभय: 🤐 महापालिका तिजोरीची लूट करण्यासाठी कारभार 'गुप्त' असणे आवश्यक आहे. खर्चाचा तपशील पब्लिक डोमेनवर येणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणुका संपल्याने आता नागरिकांच्या मताला काडीचीही किंमत देण्याची गरज नाही. 🔇

 6️⃣ समान निधीवाटप: 💰 राजकीय पक्ष ही संकल्पना आता उरली नाही, त्यामुळे सर्व नगरसेवकांना पक्षभेद न करता समान निधी मिळावा.


निष्कर्ष: 🧐 आपले सरकार “पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त” कारभाराची घोषणा करत असले, तरी वास्तवात आम्हाला आमची गुंतवणूक शांततेत वसूल करता येईल, अशी अदृश्य व्यवस्था आपण जपली आहे. जनतेला ‘गाजर’ दाखवणे 🥕 आणि आम्हाला ‘प्रशासकीय सवलत’ देणे ही कसरत फक्त आपल्यासारखा कुशल लोकनेताच करू शकतो! 🎩✨

"सबका साथ, सबका विकास" (आणि आमचा खास विकास) या सूत्रासाठी आपला वरदहस्त कायम असावा, हीच आग्रहाची विनंती. 🙏

कळावे,

आपले कृपाभिलाषी, सर्वपक्षीय नगरसेवक 🤝 (जनतेचे “तथाकथित” हितचिंतक)

संकल्पना: सुधीर दाणी [भावी नगरसेवक] 📞 9869226272 | 📧 danisudhir@gmail.com

प्रत: माननीय अर्थमंत्री (विशेष 'गुंतवणूक परतावा' निधी देण्याबाबत) 📑💼

संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणाऱ्या "बॅकडोअर पॉलिटिक्स": 'स्वीकृत नगरसेवक' संस्कृतीला चाप हवा! 🏛️

 


🚫 संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणाऱ्या  "बॅकडोअर पॉलिटिक्स": 'स्वीकृत नगरसेवक' संस्कृतीला चाप हवा! 🏛️

भारतीय लोकशाहीत विकेंद्रीकरण आणि सर्वसमावेशकता याला सर्वोच्च स्थान दिले आहे. मात्र, सध्याच्या राजकीय संस्कृतीत संविधानाच्या मूळ हेतूलाच नख लावण्याचे काम 'स्वीकृत नगरसेवक' पदाच्या माध्यमातून सुरू आहे. 📉


🔥 संकल्पना उदात्त, अंमलबजावणी विदारक!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ राजकीय प्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा (Experts) सहभाग असावा, या उद्देशाने ‘स्वीकृत नगरसेवक’ (Nominated Corporators) ही संकल्पना मांडण्यात आली. पण आज महाराष्ट्रात हे चित्र पूर्णतः बदलले आहे:

  • ❌ ही पदे तज्ज्ञांसाठी नसून राजकीय पक्षांच्या 'लाडक्या' कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी राखीव झाली आहेत.

  • ❌ पराभूत उमेदवारांना मागील दाराने (Backdoor) सत्तेत आणण्याचा हा एक मार्ग बनला आहे.

  • ❌ राजकीय निष्ठावंतांच्या सोयीसाठी संविधानाच्या चौकटीलाच मोडीत काढले जात आहे.


📝 काय सांगतो कायदा? (आणि काय घडतंय प्रत्यक्षात?)

महानगरपालिका अधिनियमानुसार, नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या १०% पर्यंत सदस्य ‘स्वीकृत’ करता येतात. यासाठी खालील निकष विहित केलेले आहेत:

क्षेत्रआवश्यक अनुभवसद्यस्थिती ⚠️
अधिवक्ताकिमान ५ वर्षे सरावराजकीय कायदे सल्लागार किंवा निष्ठावंत
निवृत्त अधिकारीपालिकेतील वरिष्ठ पदाचा अनुभवपक्षाशी जवळीक असलेले निवृत्त अधिकारी
सामाजिक कार्यकर्तानोंदणीकृत संस्थेत ५ वर्षे कामपक्षाचे झेंडे वाहणारे कार्यकर्ते
तज्ज्ञवैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षणनावापुरते निकष लावून राजकीय नियुक्त्या

📉 अपात्र नियुक्तीचे शहरावर होणारे परिणाम 🏙️

जेव्हा एखादा स्वयंपाकी 'सुगरण' नसतो, तेव्हा किराणा कितीही दर्जेदार भरला तरी अन्नाची नासाडीच होते. तसेच शहराच्या नियोजनात घडत आहे:

  1. व्हिजनचा अभाव: रस्ते, वाहतूक, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यावर चर्चा करण्यासाठी बुद्धिजीवींची गरज असते, तिथे 'अभ्यासशून्य' व्यक्ती बसल्यामुळे शहराचे नियोजन कोलमडते. 🏗️

  2. अशास्त्रीय निर्णय: DP (विकास आराखडा), स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांबाबतचे निर्णय केवळ राजकीय हिताचे घेतले जातात, शास्त्रीय दृष्टिकोनातून नव्हे. 🌍

  3. लोकभावनेचा अवमान: ज्या व्यक्तीला प्रभागातील जनतेने निवडणुकीत नाकारले, तिला संपूर्ण शहराच्या धोरणावर निर्णय घेण्याचा अधिकार देणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. 🗳️🚫


⚖️ न्यायालयीन हस्तक्षेप आणि सुधारणेची गरज

महाराष्ट्रातील अनेक न्यायालयीन निकालांनी स्पष्ट केले आहे की, “स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत तज्ज्ञतेचा हेतू मोडता कामा नये.” मात्र, राजकीय नेतृत्व याकडे दुर्लक्ष करत आहे.

आमच्या प्रमुख मागण्या:

✅ स्वतंत्र छाननी समिती: स्वीकृत सदस्यांची निवड केवळ राजकीय मर्जीवर न राहता, एका स्वतंत्र समितीमार्फत निकषांच्या आधारे व्हावी. 🧐

✅ स्पष्ट नियमावली: 'तज्ज्ञ' शब्दाचा मनमानी अर्थ लावणाऱ्या प्रशासकीय पळवाटा बंद व्हाव्यात.

✅ सुओमोटो (Suo Motu) याचिका: संविधानाचे रक्षक म्हणून न्यायालयानेच अशा लोकशाहीविरोधी परंपरांना चाप लावण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. 🏛️⚖️


📢 निष्कर्ष

राजकीय सोय म्हणून स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर करणे, हे शहराच्या विकासाचे 'अध:पतन' आहे. जर आपल्याला शहरांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करायचे असेल, तर बुद्धीजीवींना मुख्य प्रवाहात आणावेच लागेल. अन्यथा, ही पदे केवळ "राजकीय पुनर्वसन केंद्रे" म्हणूनच उरतील. 🚩


✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी

प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

📞 ९८६९२२६२७२ | 📧 alertcitizensforumnm@gmail.com



COURTESY  : AI PHOTO 


शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

⚖️ 'मत' प्रत्येक मतदाराचे: मत विकतच घ्यायचे असेल, तर निवडणूक का? लिलावच करा! 🔨

 ⚖️ 'मत' प्रत्येक मतदाराचे: मत विकतच घ्यायचे असेल, तर निवडणूक का? लिलावच करा! 🔨

बाजारू लोकशाहीला आवरता येणार नसेल, तर निवडणूक आयोगाने “लिलाव पद्धतीने लोकप्रतिनिधींची नियुक्ती” करण्याचा मार्ग स्वीकारावा!

भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या “मतदान” या संकल्पनेचे आज जे विद्रूपीकरण झाले आहे, ते पाहता लोकशाहीबद्दल अभिमान बाळगायचा की लाज वाटायची, हा प्रश्न सामान्य मतदारास सतावत आहे. 📉


💸 लोकशाही की खुला बाजार?

देशातील प्रत्येक निवडणूक ही मतदारांना आर्थिक प्रलोभने देऊनच जिंकली जाते, हे आज कोणतेही गुपित राहिलेले नाही.

  • गुंतवणूक: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये नगरसेवक होण्यासाठी १ ते १० कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी उमेदवार ठेवतो. 💰

  • बिझनेस मॉडेल: ५ वर्षांत कोट्यवधींची कमाई करण्यासाठी आज काही कोटी “गुंतवणूक” करणे—हेच आजचे राजकारण झाले आहे.


🕶️ अकार्यक्षमता की सोयीस्कर आंधळेपणा?

निवडणूक आयोगाची यंत्रणा इतकी 'कार्यक्षम' आहे की:

  1. प्रत्येक मताचा दर ठरलेला असतो. 🏷️

  2. पाकिटे थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचतात. 📩

  3. हॉटेल्समध्ये दारू-मटणाच्या पार्ट्यांची लयलूट सुरू असते. 🍗🍻

यक्षप्रश्न: हजारो अधिकारी 'निरीक्षक' म्हणून तैनात असताना, जी बाब प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांना दिसते, ती निवडणूक आयोगाला का दिसत नाही? हा केवळ सोयीस्कर आंधळेपणा नाही का? 🧐


🚫 प्रामाणिकपणा ठरतोय 'दुर्गुण'!

आजच्या राजकारणात पात्रतेचे निकष बदलले आहेत:

  • पात्रता: आर्थिक क्षमता, उपद्रव मूल्य, दहशत, काळ्या धंद्यांशी सलोखा.

  • अपात्रता: प्रामाणिकपणा, समाजसेवा, मूल्यनिष्ठा.

खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणाऱ्या नागरिकांसाठी आज निवडणूक लढवणे अशक्यप्राय बनले आहे. 🛡️


🔨 आग्रही मागणी: "लिलाव पद्धत सुरू करा!"

जर निवडणुका केवळ पैशांचा खेळ असतील आणि लोकप्रतिनिधी “खरेदी” करूनच निवडले जाणार असतील, तर निवडणूक आयोगाने हा फार्स बंद करावा!

लिलाव पद्धतीचे फायदे:

  • ⏳ निवडणूक प्रक्रियेवरील प्रचंड खर्च वाचेल.

  • 👮 मनुष्यबळाचा अपव्यय थांबेल.

  • 🎭 लोकशाहीचा हा 'दिखाऊ सोहळा' तरी बंद होईल.


🚩 हा संविधानाचा अवमान आहे!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अपेक्षित असलेली ही लोकशाही नक्कीच नाही. ही “बाजारू लोकशाही” आहे. जिथे मत विकले जाते आणि सत्ता खरेदी केली जाते, त्या व्यवस्थेला लोकशाही म्हणणे हा लोकशाही शब्दाचा आणि संविधानाचा अपमान आहे. 📖🏛️

प्रस्थापित घराणेशाही आणि सरंजामशाहीवर "मतदान खरेदी-विक्रीच्या" माध्यमातून शिक्कामोर्तब होणे हे अत्यंत खेदजनक आहे.


निष्कर्ष

हा आरसा कठोर आहे, पण सत्य आहे. व्यवस्था ज्या प्रमाणात सडलेली आहे, ते पाहता तूर्त तरी सुधारणा होणे हे मतदारांच्या दृष्टीने केवळ एक "दिवास्वप्न" ठरण्याची भीती आहे. 🌑

✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई 📞 ९८६९२२६२७२ | 📧 alertcitizensforumnm@gmail.com



PHOTO COURTESY AI 

🥀 मतदारांची अस्वस्थ भावना : अर्थकेंद्री निवडणुकांमुळे लोकशाहीला “अर्थ”च उरला नाही! 🥀

  

🥀 मतदारांची अस्वस्थ भावना : अर्थकेंद्री निवडणुकांमुळे लोकशाहीला “अर्थ”च उरला नाही! 🥀

भारतीय लोकशाही अमृतमहोत्सव साजरा करत आहे, पण "जगातील सर्वात मोठी लोकशाही" हा गौरव वास्तव आहे की केवळ आभास? हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाला सतावत आहे.


💸 १. निवडणूक : ‘सेवा’ नव्हे, तर ‘हाय-रिटर्न बिझनेस’

आज ग्रामपंचायत असो वा विधानसभा, उमेदवार "पात्र" ठरण्याचा एकमेव निकष म्हणजे त्याची आर्थिक ताकद. 💰

  • पाकिटांचे राजकारण: पूर्वी नागरिक वर्गणी काढून उमेदवार निवडायचे; आज उमेदवार मतदारांना ‘वर्गणी’ (पाकिटे) वाटून स्वतःला निवडून आणतो. 🧧

  • आमिषांचा बाजार: सोसायटीला रंगकाम, रस्ते-लाईट, तरुणांना पार्ट्या आणि मतदारांना थेट रोकड—जो हे करू शकतो, तोच "निवडणूक जिंकण्यास सक्षम" मानला जातो.

  • गुंतवणुकीवर परतावा: निवडणुकीत ३ कोटी खर्च केले की ५ वर्षांत त्याचा परतावा हजारपट मिळतो. ही लोकशाही (Democracy) नसून धनशाही (Plutocracy) आहे! 🏗️📈

🔫 २. दहशत आणि घराणेशाहीचे अभेद्य कवच

आर्थिक ताकदीसोबतच दुसरी पात्रता म्हणजे 'दहशत'.

  • साम-दाम-दंड-भेद: गावगुंड, स्थानिक दहशत आणि घराणेशाहीचा वारसा यांच्या जोरावर प्रामाणिक कार्यकर्त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 🛡️

  • अपात्रता: ज्याच्याकडे पैसा नाही, जो भ्रष्ट व्यवस्थेशी तडजोड करत नाही, असा 'प्रामाणिक जनसेवक' आज राजकारणाच्या दृष्टीने 'अपात्र' ठरत आहे.

🤔 ३. मतदारांपुढील यक्षप्रश्न : निवडायचे कोणाला?

सामाजिक संस्था आवाहन करतात "पात्र उमेदवार निवडा", पण मतदारांसमोरचा कटू प्रश्न असा की— कोणीच पात्र नाही! ❌ परिणामी, मतदार दोनपैकी एक पर्याय निवडतो:

  1. 'अपात्र' उमेदवारांपैकी “कमी अपात्र” निवडण्याची नामुष्की स्वीकारणे. 📉

  2. किंवा मतदानाकडेच पाठ फिरवणे (उदासीनता). 🚶‍♂️

🏚️ ४. भ्रष्टाचाराचे ‘महा-केंद्र’ आणि गायब पारदर्शकता

जनसेवेच्या नावाखाली सुरू असलेली लूट थक्क करणारी आहे:

  • ग्रामपंचायत: वर्षाला ३०-४० लाखांचा निधी येतो, पण २०% ही खर्च होत नाही. 🛖

  • महानगरपालिका: ही तर लुटीची महा-केंद्रेच आहेत. जर कारभार पारदर्शक असेल, तर प्रत्येक रुपयाचा हिशोब पब्लिक डोमेनवर का मांडला जात नाही? ही 'गुप्तता' म्हणजे लुटीला दिलेलं संरक्षणच आहे! 🤐💸


📢 सरकारला एक उपरोधिक मागणी: "लिलाव पद्धत सुरू करा!"

"जर सरकार आणि निवडणूक आयोग निवडणुका खऱ्या अर्थाने लोकशाहीस पोषक करण्यास समर्थ नसतील, तर सरकारने सरळ निवडणुका बंद कराव्यात! त्याऐवजी ५ वर्षांसाठी 'लिलाव पद्धत' (Auction) सुरू करावी. जो जास्त बोली लावेल त्याला पद द्यावे, जेणेकरून लोकशाहीच्या नावाखाली चालणारा हा रोजचा छळ तरी थांबेल!" 🔨⚖️


💡 मतदारांसाठी आत्मचिंतनाची वेळ!

लोकशाहीत निवडून येणारा उमेदवार हा त्या भागातील मतदारांची 'लायकी' दर्शवत असतो. हे कठोर सूत्र लक्षात घेऊन मतदारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पैसा, दहशत आणि घराणेशाहीचा हा भस्मासुर जोपर्यंत आपणच संपवत नाही, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचणार नाही. 🚩

वेळ निघून चालली आहे... जागे व्हा!


✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई 📞 ९८६९२२६२७२ | 📧 danisudhir1810@gmail.com

🚨 महापालिका निवडणुकांचा ‘नकारात्मक संदेश: "१ खोके सबकुछ ओके" सूत्र समाजसेवकांसाठी धोक्याची घंटा! 🚨

 


🚨 महापालिका निवडणुकांचा ‘नकारात्मक संदेश: "१ खोके सबकुछ ओके" सूत्र समाजसेवकांसाठी धोक्याची घंटा! 🚨

राजकारण की धंदा? वर्तमान महापालिका निवडणुकांचे डोळसपणे अवलोकन केले असता एक कटू सत्य समोर येते—उमेदवाराची 'समाजसेवक' ही प्रतिमा आणि 'निवडणूक निकाल' यांचा आता दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही. 📉


🧲 समाजकारण vs राजकारण: दोन विरुद्ध ध्रुव

या निवडणुकांनी एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध केली आहे की, समाजकारण आणि राजकारण आता चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव झाले आहेत.

  • 🚫 समाजसेवकांना इशारा: जणू समाजानेच संकेत दिला आहे की, "तुम्ही फक्त समाजसेवा करा, सत्तेच्या वाटेला जाऊ नका."

  • 🚩 धोक्याची सूचना: प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पराभव हा केवळ एका व्यक्तीचा पराभव नसून, संपूर्ण समाजव्यवस्थेला दिलेला एक घातक इशारा आहे.


📊 निवडणुकीचे नवीन 'बिझनेस मॉडेल' (गणिताच्या भाषेत)

केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक कशी जिंकली जाते, याचे हे भयावह गणित समजून घ्या:

  1. मतदारांची संख्या: एका प्रभागात सरासरी ३०,००० मतदार.

  2. प्रत्यक्ष मतदान: ५० ते ६०% म्हणजे साधारण १५ ते १८ हजार मतदान.

  3. पक्के मतदार: २० ते ५०% लोक उमेदवाराचा चेहरा न पाहता चिन्हावर मतदान करतात. 🗳️

  4. विजयाचे समीकरण: तिरंगी लढतीत केवळ ४,००० ते ८,००० मते मिळाली की विजय निश्चित! 🏆


🔥 "१ खोके सबकुछ ओके" : विजयाचा नवा मंत्र

आजच्या बाजारात मतांचा भाव २,००० ते ५,००० रुपयांपर्यंत (काही ठिकाणी १०,०००) पोहोचला आहे. ज्या उमेदवाराकडे खालील 'शक्ती' आहे, त्याला समाजसेवेची गरजच उरलेली नाही:

  • 💰 रोखशक्ती: २ ते ३ हजार मते विकत घेण्यासाठी ४० ते ८० लाखांची रोकड.

  • 🍗 प्रचार खर्च: मटण, दारू आणि रॅलीसाठी १०-२० लाख रुपये.

  • एकूण बजेट: साधारण '१ खोका' (१ कोटी). 💸

निकाल: उमेदवाराचे चारित्र्य कसेही असो, त्याने एक दिवसही समाजसेवा केली नसो, तो या '१ खोक्याच्या' बळावर सहज निवडून येतो. हाच महाराष्ट्रातील निवडणुकांचा आजचा विदारक चेहरा आहे.


🔄 गुंतवणूक आणि परतावा (ROI)

निवडणुकीत लावलेला हा '१ कोटी' निवडून आल्यावर महानगरपालिकेच्या माध्यमातून १०० पटीने वसूल करता येतो. म्हणूनच आज राजकारण हा “Low Investment – Low Risk – High Return” या फॉर्म्युल्यावर चालणारा एक नवा फायदेशीर ‘व्यवसाय’ झाला आहे. 📈💼


🚩 महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब

ज्या महाराष्ट्राने देशाला महान समाजसेवक दिले, त्याच मातीत आज 'समाजसेवा नगण्य आणि पैसा सर्वोच्च' ही प्रवृत्ती वाढत आहे.

"समाजसेवकांनी राजकारणात पडू नये" असे म्हणणारे खूप आहेत. पण समाजाचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी सत्तेचे पद आवश्यक झाले आहे. जर राजकारण केवळ गुंतवणुकीवरच उभे राहणार असेल, तर भविष्यात सामान्य नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार? ❓


📢 जागे व्हा... नाहीतर अंधार अटळ आहे!

वेळ निघून जाण्यापूर्वी समाजाने जागे होणे आवश्यक आहे. जर 'खोके संस्कृती' अशीच फोफावत राहिली, तर लोकशाहीचे भविष्य अंधारात हरवेल हे नक्की. 🌑

- सुधीर लक्ष्मीकांत दाणी प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई 📞 9869226272 | 📧 alertcitizensforumnm@gmail.com




COURTESY:  AI PHOTO 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे जतन आणि संवर्धन – काळाची गरज!


 

 लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे जतन आणि संवर्धन – काळाची गरज!



१२ ऑक्टोबर हा दिवस प्रत्येक सजग नागरिकासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी भारतात माहिती अधिकार कायदा (RTI Act) लागू झाला.
लोकशाहीची खरी ओळख म्हणजे पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सहभाग. पण दोन दशके पूर्ण होत असताना हा कायदा हळूहळू निष्प्रभ, बेजबाबदार आणि उपेक्षित अवस्थेत गेला आहे. हे वास्तव अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे.


🔍 डंका पारदर्शकतेचा – कारभार मात्र गुप्तच

राज्यकर्ते, नोकरशहा आणि प्रशासकीय यंत्रणा हे लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत.
परंतु आज हीच यंत्रणा नागरिकांपासून माहिती लपवते, अर्जांना उत्तर देत नाही, आणि आदेशांची अंमलबजावणी टाळते. अनेक ठिकाणी “सुविधा शुल्क”, दडपशाही आणि माहिती न देण्याची प्रवृत्ती ही जणू व्यवस्थेचा भाग झाली आहे.

लोकशाहीतील पारदर्शकतेचा पाया म्हणजे माहितीचा मुक्त प्रवाह.
पण जेव्हा माहितीच थांबवली जाते, तेव्हा लोकशाही केवळ नावापुरती राहते आणि ती “हुकूमशाहीचे लोकशाही आवरण” बनते.


🏛 प्रशासकीय सुधारणा की राजकीय दिखावा?

अलीकडेच राज्य शासनाने “शंभर दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम” मोठ्या थाटामाटात जाहीर केला.
पण वास्तव असे की त्या सुधारणा केवळ फाइल्स आणि प्रेस नोट्सपुरत्याच मर्यादित राहिल्या.
नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी कोणतेही ठोस उपाय —

  • नवे डिजिटल प्लॅटफॉर्म,

  • सार्वजनिक नोंदवही,

  • खुल्या बैठका किंवा पारदर्शक बजेट प्रणाली —
    अमलात आलेली नाहीत.

“सुधारणा” हा शब्द आज प्रचाराचा आणि लोकानुनयाचा भाग बनला आहे, प्रत्यक्षात नाही.


⚖️ ब्लॅक धंदे करू नका आणि ब्लॅकमेल होऊ नका

आरटीआय कायद्यास बदनाम करण्यासाठी अनेकदा नोकरशाही व सत्ताधारी वर्ग असा दावा करतात की “बहुतांश RTI कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात.”
पण हा आरोप म्हणजेच – “सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” या म्हणीप्रमाणे आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर,
👉 “तुम्ही प्रशासनात काळेबेरे केले नाही, तर कोणीही तुम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही.”

आरटीआयमुळे प्रशासनातील काळे धंदे आणि भ्रष्टाचार उघडकीस येत आहेत, म्हणूनच काही ‘झारीचे शुक्राचार्य’ या कायद्याला बदनाम करण्याचे प्रयत्न करत आहेत.

होय, काही ठिकाणी आरटीआयचा गैरवापर होतो हे मान्यच आहे. पण दुसरी बाजू म्हणजे, प्रशासनही धुतल्या तांदळ्यासारखे निर्दोष नाही.
दोन्ही बाजूंनी आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.


🧭 राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्ष पारदर्शक कारभाराचा डंका पिटवतात.
पण माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे धाडस कोणत्याही पक्षाने दाखवले नाही.
न्यायालयीन आदेश असूनही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी विभागांनी आवश्यक माहिती वेबसाइटवर जाहीर करणे टाळले आहे.

लोकशाहीचे तारणहार म्हणवणारे हेच नेते नागरिकांना अंधारात ठेवण्याचे कटकारस्थान रचत आहेत, आणि नागरिक मात्र भ्रमात ठेवले जात आहेत.


✊ आता गरज – रचनात्मक संघर्षाची

माहिती अधिकार कायद्याच्या हत्येविरुद्ध आता रचनात्मक आंदोलनाची वेळ आलेली आहे.
प्रत्येक संघर्ष हा रस्त्यावरचा मोर्चा असायलाच हवा असे नाही.
प्रत्येक नागरिकाने संविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवावा.

उदाहरणार्थ —
👉 “जोपर्यंत माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक होत नाही, तोपर्यंत मी मतदान करणार नाही.”

असा एक प्रामाणिक संकल्प जर नागरिकांनी केला, तर शासन यंत्रणेला माहिती सार्वजनिक डोमेनवर टाकल्याशिवाय पर्यायच राहणार नाही.

राजकारणी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत —
ते फक्त ‘मत गमावण्याला’ घाबरतात.
त्या भीतीचा उपयोग नागरिकांनी लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी करावा.


🧩 लोकशाहीची पारदर्शकता जिवंत ठेवण्यासाठी उपाय

१️⃣ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचे सर्व निर्णय, खर्च, निविदा आणि बैठकींचे इतिवृत्त सार्वजनिक डोमेनवर प्रकाशित करणे बंधनकारक करावे.
२️⃣ RTI अर्जांची डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली राज्यस्तरावर तयार करावी — माहिती न मिळाल्यास अर्ज आपोआप उच्च अधिकाऱ्यांकडे जावा.
३️⃣ RTI आयोगांची संख्या वाढवून त्यांना आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता द्यावी; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र माहिती आयुक्त असावा.
४️⃣ माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे.
५️⃣ प्रत्येक जिल्ह्यात Public Information Dashboard सुरू करावे, जेणेकरून नागरिकांना रिअल-टाइम माहिती मिळेल.
६️⃣ शाळा, महाविद्यालये व नागरिक प्रशिक्षण केंद्रांतून RTI शिक्षण अभियान राबवावे, जेणेकरून “माहितीचा अधिकार” हा “जाणीवेचा अधिकार” बनेल.


🕊 लोकशाहीचा श्वास — माहिती अधिकार

लोकशाही टिकवायची असेल, तर माहितीचा प्रवाह अखंड ठेवावा लागेल.
माहिती अधिकार कायदा हा केवळ एक कायदा नाही —
तो लोकशाहीचा श्वास, तिचे हृदय आणि आत्मा आहे.

या श्वासाला रोखण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही सत्ता कितीही बलाढ्य असली, तरी ती लोकशाहीच्या आत्म्याची हत्या करत असते.

राज्यकर्त्यांनी आणि नोकरशाहीने हे समजून घ्यावे —

“माहिती लपवणे म्हणजे विश्वास गमावणे.”

आज उपाययोजना केल्या नाहीत, तर उद्या लोकशाही केवळ इतिहासात उरणार आहे.
निर्णय तुमचा – लोकशाही वाचवायची की तिला दफन करायचे.


✍️
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
अध्यक्ष – सजग नागरिक मंच, नवी मुंबई
📞 ९८६९२२६२७२

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

मा . न्यायालयाने यंत्रणासमोर प्रायोगिक तत्वावर रस्ते निर्माण करून ,दर्जदार रस्त्यांच्या " कृतियुक्त वस्तुपाठ " ठेवावा !

         दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील नागरिकांना एकच भीषण वास्तव पुन्हा पुन्हा अनुभवावेच  लागते . ते असे : खड्डेमय रस्ते. जीवघेणी वाहतूक, अपघातांचे प्रमाण वाढणे, वाहनांची झीज, इंधनाचा अपव्यय, प्रवासाचा वाढलेला कालावधी .  ही सगळी परिस्थिती आता इतकी सवयीची झाली आहे की जणू नागरिकांनी आपले प्राक्अशी समजूत करून ती सर्वमान्य केलेली  आहे . 

          पण, खरा प्रश्न असा आहे की हजारो कोटींचा खर्च करूनही आपण अजूनही टिकाऊ, सुरक्षित दर्जेदार रस्त्यांच्या प्रतीक्षेत का आहोत? जनतेच्या मनातील हाच प्रश्न मा . मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच  महानगरपालिका एमएसआरडीसीला  विचारला  आहे .  महापालिका आणि एमएसआरडीसीची ला या अनुषंगाने धारेवर धरलेले आहे.    मा . न्यायालयाने प्रश्न  यंत्रणांना प्रश्न विचारला आहे की ,  पूर्वी -१० वर्षे टिकणारे रस्ते अलीकडच्या काळात  एकाच पावसात का वाहून जातातरस्त्यांची ही दुर्दशा का? करोडो मोलाचा  प्रश्न आहेत   हे  ! 

                      आजवर प्रशासन  पावसाला दोष देण्याचा सोपा मार्ग निवडताना दिसते .  परंतु खरे कारण सर्वांनाच ठाऊक आहे भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि निकृष्ट दर्जाचे काम , अभियंत्याचे दर्जाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष , बिले काढण्यासाठी अनिवार्य असणारे लक्ष्मी दर्शन , स्थानिक लोकप्रतिनिधींचे उपद्रवमूल्य शमन निधी , मंत्रालयापर्यंतची टक्केवारी ,  रस्ते बांधणी शास्त्राला दिला जाणारा फाटा ,  आर्थिक लोभापायी वारंवार त्याच त्या रस्त्यांवर थर चढविण्याच्या प्रकारामुळे रस्त्यामंध्ये निर्माण झालेला असमतल , रस्त्यावर पाणी साठू नये  यासाठी वॉटर टेबल , रस्त्यांना आवश्यक केंबर (उतार ) , वॉटर एंट्री होल  रस्त्यांपेक्षा उंच अशी विविध कारणे  दर्जाहीन रस्ते निर्मिती साठी असलयाचे दिसतात . 

 

                 "  उच्चतम दर आणि न्यूनत्तम दर्जा "  हेच रस्ते निर्मिती देखभालीचे प्रशासकीय राजकीय  सूत्र झालेले आहे . खेदाची गोष्ट हि आहे की  यास सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या नेत्यांची सहमती असते  कारण सत्ताधारी आणि विरोधक हे सर्वच आळीपाळीने याचे लाभार्थी ठरत असतात . रस्ता कितीही निकृष्ट दर्जाचा तयार होताना दिसला तरी आजवर ना कधी कोणत्या नगरसेवकाने , आमदाराने वा खासदाराने  रस्त्यांच्या दर्जाहिनतेबाबत तक्रार केल्याची एक हि घटना आजवरच्या भूतकाळात घडलेली नाही . यातच सर्व काही आले

           महाराष्ट्रात आणि देशात रस्त्याच्या अंदाजपत्रकातील  ३० टक्क्यांपर्यंतची  रक्कम ही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीत जाते, हे उघड गुपित आहे. अशा परिस्थितीत कंत्राटदार दर्जेदार साहित्य वापरतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे दिवा स्वप्न पाहणेच. रस्ता अभियांत्रिकी शास्त्राकडे केलेले दुर्लक्ष, पाण्याचा निचरा होईल अशी रचना करणे, योग्य उतार देणे, वॉटर टेबल कन्सेप्टला तिलांजली देणेही सर्व कारणे रस्ता टिकाऊ होण्यामागे आहेत.याहून सर्वात  गंभीर बाब म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत आपल्याकडे प्रति किलोमीटर खर्च प्रचंड जास्त आहे, तरीही रस्त्यांचा दोष निवारण कालावधी अत्यंत कमी आहे. अन्य देशात डांबरी रस्ता १० वर्षे सिमेंटचा रस्ता २०२५ वर्षे टिकतो; मग भारतातच का टिकत नाही?

 

 

गरज ठोस उपायांची :

जर   खरोखर दर्जेदार रस्ते हवे असतील तर काही ठोस पावले उचलणे अपरिहार्य आहे: ती अशी

·        स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा : न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून प्रत्येक रस्त्याची गुणवत्ता तपासली जावी.

·                    मुंबईसह राज्यातील   ५ महापालिकांच्या ५ प्रभागात   न्यायालयांच्या निगराणी खाली प्रायोगिक रस्त्यांची निर्मिती :  योग्य दर्जाचे साहित्य वापरले , रस्त्यांची निर्मिती अभियांत्रिकी निकषांचे पालन करून  रस्त्यांची निर्मिती केली तर ते किती काळ टिकतात याची  'कृतियुक्त पडताळणी ' करण्यासाठी  मा . मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःच्या निगराणीखाली   स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपाशिवाय  आयआयटी मुंबई व्यतरिकीत अन्य  आयआयटी तज्ज्ञांच्या सुपरव्हिजन मध्ये  मुंबईसह राज्यातील     महापालिकांच्या प्रत्येकी ५ प्रभागात प्रायोगिक रस्त्यांची निर्मिती करत  ते  किती वर्षे टिकतात याची पडताळणी करावी .  त्यातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे  मुंबई व राज्यातील रस्त्यांचे आयुर्मान , दोषनिवारण कालावधी व प्रति किमी खर्च सुनिश्चित करावा .

                 खरे वास्तव हे आहे की  प्रशासन व लोकप्रतिनिधींसाठी डांबरी रस्ते , सिमेंटचे रस्ते निर्मिती देखभाल हे बारमाही दूध देणारी दुभती गाय ठरत असल्याने दर्जेदार रस्ते निर्माण करणाऱ्या कंत्राटदाराला कंत्राट दिले जात नाही . पुणे शहरात तब्बल ४० वर्षे एकही खड्डा न पडणाऱ्या  जंगली महाराज  रोडची निर्मिती करणाऱ्या रेकान्डो कंपनीला नवी मुंबईतील पामबीच बाबत अपात्र ठरवण्यात आलेले होते . अभियंते दर्जेदार असावेत : प्रत्येक महानगरपालिकेतील शहर अभियंता पदी थेट आयआयटी किंवा तत्सम संस्थेतून उत्तीर्ण अभियंत्यांची अनिवार्य करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत .

·        उत्तरदायित्व फिक्स करावे : वर्तमानात करोडो रुपये खर्च करून बांधलेले रस्ते वर्षा वर्षात पूर्णतः उघडले गेले तरी संलग्न अभियंता , कार्यकारी अभियंता , शहर अभियंता , आयुक्तांना जबाबदार ठरवले जात नाही . उलटपक्षी त्यांचा गोपनीय अहवाल 'उत्कृष्ट ' नोंदवला जातो . उत्तरदायित्व शून्य व्यवस्थेमुळे प्रशासनाला धाक उरलेला नाही आणि म्हणूनच वर्षानुवर्षे निकृष्ट रस्ते निर्माण करणारे प्रशासन सुखनैवे नांदत आहे .  प्रत्येक रस्त्यांचा दोषनिवारण कालावधी फिक्स करून त्या कालावधीत रस्त्यांचे उत्तरदायित्व हे संलग्न अभियंता , आयुक्तांवर , सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रशासनावर फिक्स केले जावे . मा . न्यायालयाने तसे निर्देश देणे काळाची गरज आहे .

·        दोष निवारण निधी : रस्ता खराब झाल्यास कंत्राटदाराकडून तातडीने दुरुस्ती करून घेण्यासाठी कायदेशीर प्रावधान असावे.

·        युटिलिटी डक्ट अनिवार्य असावेत : विविध पायाभूत सुविधांसाठी वारंवार केली जाणारी रस्ते खुदाई हे देखील खड्डेमुक्त रस्त्यांच्या स्वप्नपूर्तीतील प्रमुख अडथळा असल्याने , रस्ता तिथे टेलिकॉम केबल , विद्युत केबल , इंटरनेट केबल यासाठी "भूमिगत वाहिन्यांची निर्मिती " सक्तीची करावी .

·        नागरिकांचा सहभाग : स्थानिक नागरिकांच्या निरीक्षणाखाली कामे झाल्यास पारदर्शकता वाढेल.

 

तो वर भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या वल्गना वांझोट्याच :

               रस्ते हा कोणत्याही राज्याच्या कारभाराचा आरसा असतो. महाराष्ट्रात मुंबईत रस्त्यांवर कोट्यवधी-हजारो कोटी खर्च होऊनही नागरिकांना फक्त खड्डेच नशिबी येतात. या दुर्दशेमागील एकमेव कारण म्हणजे लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यातील संगनमत लूट.

          भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या घोषणा जोपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यांच्या निर्मितीत प्रतिंबिंबित होत  नाहीत, तोपर्यंत  भ्रष्टाचार मुक्त शासन प्रशासन या केवळ वांझोट्या घोषणा आणि अफवा ठरतात.

                  खरे तर  दर्जेदार रस्ते निर्मिती हे कुठलेही रॉकेट तंत्रज्ञान नसून , गुणवत्तापूर्ण , दर्जदार , दीर्घकाळ टिकणारे रस्ते  निर्माण करणे वर्तमान तंत्रज्ञानाच्या आधारे सहज शक्य आहे .   अनेक पाश्चात्य विकसित देशात  हे सप्रमाण सिद्ध झालेले दिसून येते . त्यामुळे महाराष्टात  आणि भारतात ' अमेरिकेसारखे डांबरी सिमेंटचे रस्ते  निर्माण करणे अशक्य नकीच नाही . अर्थातच जर प्रशासनात आणि लोकप्रतिनिधींमध्ये तशी   इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर आणि तरच . 

 

     अर्थातच या करदात्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत , स्वप्न आहेत .  अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की  वर्तमान राजकीय प्रशासकीय कुसंस्कृती लक्षात घेता  नजीकच्या भविष्यकाळात तरी  " गुणवत्तापूर्ण दर्जदार टिकाऊ रस्ते हे  केवळ आणि केवळ  एक दिवास्वप्न ठरतात

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

[लेखक विविध विषयाचे अभ्यासक आहेत सजग नागरिक मंच नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत ]

संपर्क  ईमेल : alertcitizensforumnm@gmail.com 9869226272