THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

अनिर्बंध विस्तार ,भ्रष्ट व्यवस्था, शहर रचनेत अनिर्बंध राजकीय हस्तक्षेप व निसर्गाला पायदळी तुडवणारी संस्कृती शहरांच्या वर्तमान दुर्दशेस कारणीभूत ...




अनिर्बंध विस्तार ,भ्रष्ट व्यवस्था, शहर रचनेत अनिर्बंध राजकीय हस्तक्षेप  निसर्गाला पायदळी तुडवणारी संस्कृती शहरांच्या वर्तमान दुर्दशेस कारणीभूत ...

     कुठलेच नियोजन नसणे म्हणजेच नियोजन असेशहर नियोजन असणाऱ्या राज्यात शहरांची अवस्था काय होऊ शकते याची मूर्तिमंत प्रचिती  मागील १५ -२० दिवसाच्या कालावधीत पूरग्रस्त कोल्हापूर -सांगली -सातारा -ठाणे -पालघर - कोकणच्या माध्यमातून  महाराष्ट्राला आली .

       सवयीने निसर्गाला दूषणे देऊन  , निसर्गाच्या प्रकोपामुळेच शहरे पूरग्रस्त झाले असे भासवत आपली जबाबदारी झटकणाऱ्या सर्वच घटकांनी , सत्ताधारी -विरोधी राजकीय पक्षांनी , , राज्यकर्त्यांनी , नेतृत्वांनी आणि विशेषतः शहरीकरणाशी निगडीत यंत्रणांनी  " कुठे , नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा " या बाबतची चिंता त्याच बरोबर चिंतन करणे गरजेचे दिसते .

आपल्या राजकीय -प्रशासकीय संस्कृतीचा इतिहास पाहता पूर जसा ओसरत जाईल तस तसे पूरपरिस्थिती , तिचा व्यक्ती -समाज-अर्थ पातळीवर होणारा दुष्परिणाम याचे गांभीर्य देखील विसरत जाईल . पूरपरिस्थितीच्या काळात शहरीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी माध्यमे देखील हळूहळू अन्य विषयाकडे वळतील पुन्हा अशाच प्रकारची गंभीर चर्चा पुढच्या पूर परिस्थितीच्या वेळेस सुरु होईल . या दृष्टचक्रातून बाहेर पडल्याशिवाय शहरांच्या दुर्दशेला पूर्णविराम मिळणार नाही .



नगर रचनांचा तातडीने पुनर्विचार आवश्यक :

            शहर नियोजन हे एक  शास्त्र आहे . केवळ मोठमोठाल्या अस्ताव्यस्त इमारती म्हणजे शहर नव्हे . शहर नियोजन करताना सर्व ऋतूंचा साकल्याने विचार करून आगामी / दशकांचा काळ समोर ठेवत त्या शहरातील संभाव्य लोकसंख्या , त्या लोकसंख्येस आवश्यक रस्ते -सर्व्हिस रोड , मोकळे मैदाने ,गार्डन्स ,पिण्याचे  पाणी -सांडपाणी व्यवस्था , शाळा -हॉस्पिटल्स -पार्किंग व्यवस्था , टेलिफोन -गॅस -इलेक्ट्रिसिटी यासम पायाभूत सुविधांसाठी भुयारी डक्टस , मनोरंजनासासाठी चित्रपट -नाट्यगृहे , पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा , खाजगी आस्थापने -सरकारी आस्थापने यांच्यासाठी राखीव योग्य आकाराचे  भूखंड, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग ची व्यवस्था , घनकचरा व्यवस्था , आवश्यक वृक्षासाठी जागेची व्यवस्था यासम  अनेक गोष्टींचा सखोल साकल्याने विचार करणे गरजेचे असते .

   धनरेषेची पूररेषेवर  मात पुरपरिस्थितीस सर्वाधिक कारणीभूत :

        महाराष्ट्रातील वर्तमान पूर्वपरिस्थितीस सर्वाधिक कारणीभूत घटक म्हणजे बिल्डरांनी आपल्या धनरेषेच्या जोरावर पूररेषेला आकुंचित करणे . सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की , आपल्याकडील किती शहरात या गोष्टींचा विचार केला जातो ? याचे उत्तर ९९ टक्के शहरांच्या बाबतीत " सुयोग्य विचार केला जात नाही " असेच आहे .

   कुठल्याही सुनिश्चित नियोजनाशिवाय  केवळ विस्तार झालेल्या भागाला 'शहरे ' संबोधने कितपत रास्त आहे? याचाच आधी विचार करणे गरजेचे आहे . सो कॉल्ड कुठल्याही शहराचा विचार केला तर त्यातील अर्ध्याहून अधिक भाग हा अनधिकृत बांधकामांनी निर्माण झालेला असतो , तर केवळ सरकारी नामक यंत्रणेच्या परवानगीचा कागद आहे म्हणून 'अधिकृत ' समजल्या जाणाऱ्या भागाने उलट -सुलट कारभार करत निसर्गाला बाधा पोह्चवलेली असते . अशा प्रकारामुळेच कोल्हापूर -सांगली -ठाणे -कोंकण सह अनेक विभागात पूरपरिस्थिमुळे अतोनात नुकसान झाले , अनेकांचे संसार उध्वस्त झाले . यास जबाबदार कोण ? तर कोणीच नाही ! कारण आपल्या लोकशाही व्यवस्थेचा स्थायीभावच असा झालेला आहे की , All  are  responsible  means nobody is  responsible .

       More cooks spoil the broth या उक्ती  नुसार शहर नियोजन इमारत परवानगी संदर्भात अनेक यंत्रणा , खंडीभर नियम कारणीभूत दिसतात . खंडीभर नियम असूनही शहरांची अवस्था बकाल का झाली आहे याचे थेट उत्तर म्हणजे " विकाऊ यंत्रणा त्यातून होणारे सर्रासपणे नियमांचे उल्लंघन ". शहरांच्या बाबतीत सर्वाधीक केली जाणारी दिशाभूल म्हणजे शहरांचा 'विकास' होतो आहे . प्रत्यक्षात शहरांचा विस्तार होतो आहे आणि तो देखील संपूर्णतः अनियंत्रित पणे .

Town  प्लॅनिंग नव्हे own  प्लँनिंग  :

  कुठल्याही शहराच्या विकासात महत्वाची भूमिका असते तो "नगर रचना विभागाची " . टाऊन प्लँनिंग म्हणजेच शहराचा विकास कसा करावयाचा याची दिशा ठरवणारा , भविष्यातील विकासाची ब्ल्यूप्रिंट देणारा विभाग
   संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य नागरीकरणात अग्रेसर असल्याची दवंडी पिटवली जात असली तरी प्रत्यक्षात आपल्या कडे शहरनिर्मिती-शहरविस्ताराचे कुठलेही शास्त्रशुद्ध तंत्र पाळले जात नाही .अनियंत्रितपणे विस्तारीत जाणाऱ्या खेड्याला तालुक्याचा दर्जा , अनियंत्रितपणे विस्तारीत जाणाऱ्या तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा आणि पुढे शहरांभोवती असणाऱ्या -विस्तारणाऱ्या भागाचा समावेश करत लोकसंख्येची -१० लाखाची वेस ओलंडणाऱ्या शहरांना 'महानगरे ' म्हणावयाचे. फक्त नामकरण, पायाभूत सुविधांचे कुठलेही उच्चीकरण नाही
     ९९ टक्के तालुका -जिल्ह्यांची ठिकाणे हे 'अधिकृत अस्ताव्यस्तपणे' आणि ' अनधिकृत खिचडीने ' निर्माण झालेल्या बांधकामांनी ग्रासलेली आहेत . प्रत्येक व्यक्तीने-राज्यकर्त्याने -बिल्डरने  , स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापल्या मर्जीप्रमाणे बांधलेल्या इमारती म्हणजे टाऊन प्लॅनिंग अशी सध्याची परिस्थिती झालेली असल्यामुळे नगर रचना विभागाचे अस्तित्व 'शून्य ' झालेले आहे . शहरांच्या बकालीकरणासाठी हे सर्वात महत्वाचे कारण आहे .

शहर विकास -नियोजन संस्कृतीचा अभावच :

अनेक विकसीत देशांमध्ये आगामी २५-५० वर्षाचा विचार करून शहरांचा आरखडा बनवला जातो नंतर त्याची तंतोतंत अंमलबजावणी  कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय  केली जाते . आपल्याकडे खऱ्या अर्थाने नियोजनाचाच अभाव आहे . नियोजन केले जाते ते तुकड्या तुकड्या ने . खाडी वर भराव टाकून , डोंगरे -टेकड्या कोरून / एकराची जागा तयार केली  जाते किंवा शहरालगत / एकराची जागा असेल तर  ती बिल्डरांना दान केली जाते तिथे 'अमुक सिटी ' , 'तमुक सिटी ' नावाने इमारती बांधल्या जातात . अशा अनेक सो कॉल्ड 'Sea -View City  ', 'Hill -View City ' चे पितळ या पावसाळ्यात उघडे पडले आहे . सू -नियोजीत सिटीच्या नावाने सदनिका विकलेल्या ठिकाणी पहिल्या माजल्यापर्यंत पाणी साठले होते . यातून नियोजन किती धूळफेक करणारे आहे हेच अधोरेखीत होते .

       पावसाचे पाणी ड्रेन होण्यासाठी अगदी बोटावरची शहरे वगळता कुठेच व्यवस्था नाही . संपूर्ण शहराचा विचार करून ड्रेनेज सिस्टीम हा प्रकारच अस्तित्वात नाही . आपल्या प्रभागासाठी नगरसेवक नाल्या मंजूर करून घेतात बनवतात . ज्याला प्रारंभ नाही अंत ही नाही अशा नाल्यांचा नियोजनामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार ? उत्तर कोणाकडेच नाही . ज्या काही नैसर्गिक ड्रेनेज सिस्टीम होत्या त्या भूखंडाच्या मलईच्या हव्यासाने निकाली काढल्या गेल्या आहेत . शहरी करणाच्या रेट्यात ओढे -नाले - नदीचे पात्रच आकुंचन पावलेले आहे .

                    स्थानिक स्वराज्य संस्था शहर विकासाच्या बाबतीत किती असंवेदनशील असू शकतात यासाठीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नियोजीत शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईची महानगर पालिका सिडको  . सुनियोजित शहर असून देखील येथे सर्रासपणे टेकड्या तोडून खाडीवर अतिक्रमण करून प्लॉट पाडले जात आहेत . निसर्ग संवर्धनाला पायदळी तुडवत 'अर्थपूर्ण ' संबंधातून ती बिल्डरांना आंदण दिले जात आहेत . हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . यावरून अन्य ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा अंदाज येऊ शकेल .

          अगदी जिल्हा परिषदेत आदिवासी भागात शाळेत शिकणारे पोर देखील हे सांगू शकते की , शहरातील रस्त्यांची उंची हि इमारतींच्या पायाच्या उंचीच्या (stilt parking level ) खाली असायला हवी कारण पाणी हे नेहमी उताराच्या दिशेने वाहते . आपल्या देशातील -राज्यातील रस्ते पहा ! अनेक ठिकाणी रस्ते हे अधिक उंचीवर गेले आहेत तर इमारतीचे बेसमेंट हे रस्त्याच्या उंचीपेक्षा / फूट खाली गेले आहेत . मग अशा इमारती मध्ये पाणी शिरणार नाही तर काय होणार ?

             समुद्र सपाटीपासूनची उंची लक्षात घेता , अनिर्बंधपणे  नैसर्गिक प्रवाहांना बांध घालत , नदी पात्रावर आक्रमण करत ज्या शहरात इमारती बांधल्या जात आहेत त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरांची जी दुर्दशा अनपेक्षित नक्कीच नाही . जे पेरले ते उगवणारच हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसारच निसर्गाने फटकारले आहे . आता किमान यातून तरी शासन -प्रशासन यंत्रणांनी ,लोकप्रतिनिधींनी ,बिल्डरांनी नागरीकांनी बोध घेत शहर नियोजन विकासाच्या बाबतीत  भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी योग्य तो धडा घेण्याची गरज आहे .


            शासकीय यंत्रणांनी परवानगी दिली म्हणून त्या ठिकाणी वसवले जाणारे शहर /इमारती रास्त आहेत या गैरसमजातून बाहेर पडणे गरजेचे आहे . शहर विकास इमारती बाबत हजारो नियम आहेत पण त्याची अपेक्षीत अंमलबजावणी होता , या नियमांचा वापर केवळ केवळ अडवणूक करत यंत्रणांचे हात ओले करण्यासाठी  जातो त्यामुळेच शहरे बकाल होत आहेत तर ५० लाख /करोड /दीड करोड रुपये खर्च करून देखील नागरीकांच्या सदनिका पाण्यात जात आहेत . स्थानिक स्वराज्य संस्था ,सिडको ,म्हाडा तत्सम निगडीत संस्था शहराच्या बकालीकरणास प्रमुखपणे जबाबदार आहेत . जो पर्यंत शहर नियोजन विकासाशी निगडीत यंत्रणा विक्रीस उपलब्ध आहेत तो पर्यंत शहरवासीयांच्या नशिबी दुर्दशा ठरलेलीच असणार आहे .


      ज्या देशात कुठलाच नियम पाळणे हाच नियम आहे त्या देशात निसर्ग मानवाला फटकारणारच हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज असत नाही . विकासाच्या नावाखाली आपण सर्वानी ( होय ! आपण सर्वांनीच  ) जो निर्लजपणाचा कळस गाठला आहे त्याची फळे आपणा सर्वांनाच भोगावे लागणार हे नक्की. आणि गेल्या काही वर्षात घडणाऱ्या गोष्टी ह्या दृष्टचक्राचा केवळ ट्रेलर आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही . पाश्चात्य देशात देखील शहरीकरणाचा वेग वाढलेला आहे परंतु त्यांनी हा विकास करताना काही बंधने पाळलेली दिसतात आपण मात्र  निसर्गाच्या सर्व बंधनांना पायदळी तुडवत आहोत . इमारत बांधकामाचे नियम सर्रासपणे सर्वच यंत्रणांकडून 'विक्रीस ' उपलब्ध झालेले असल्यामुळे नदीच्या पात्रावर आक्रमण करत , टेकड्या कोरून , खाडीलगत भराव टाकून इमारती बांधल्या जात आहेत . निसर्गावर आक्रमण केले जात आहे आणि पुन्हा कोल्हेकुई केली जाते आहे की , इमारतींमध्ये , नागरी वस्तींमध्ये पाणी शिरले , जनजीवन विस्कळीत झाले , संपत्ती -मानवी हानी झाली , वगैरे वगैरे .खरे तर पाणी मानवी वस्तीत , इमारतीत शिरले नसून मानवाने पाण्याच्या  जागेत शिरकाव केला आहे .

         कुठल्याही घटनेतून धडा घेत शिकायचेच नाही , शहाणे व्हायचे नाही हाच आपल्या गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या सरकारी -बिगरसरकारी यंत्रणांचा , काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्वच नागरीकांचा स्थायी भाव झालेला आहे . त्यामुळे आगामी १०/२० वर्षात नैसर्गिक क्रियांना दृष्टचक्र संबोधले जाते ते १०० टक्के विस्तारणार आहे हे नक्की . स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या मानवाने घडणाऱ्या घटनांतून कुठलाच 'धडा ' घ्यायचा नाही असा  चंग  बांधत विकास करायचा ठरवलेला असला तरी निसर्ग मानवाला नक्की धडा शिकवणार हि काळी दगडावरची रेष आहे .  आता नाही तर पुन्हा कधीच नाही या वळणावर आपण आलो आहोत . अर्थातच मोठा विलंब झालेला असला तरी अजूनही 'विकास ' की  'विनाश ' या पैकी नक्की काय हवे हे निवडण्याची वेळ मात्र अजूनही आपल्या हातात आहे . जागे व्हा ! अन्यथा भविष्यात   दृष्टचक्र विस्तारतच जात मानवाचा विनाश अटळ असणार आहे हे नक्की .

दृष्टिक्षेपातील उपाय :

 ) शहर नियोजन ठरवणारी राज्य स्तरीय एकच यंत्रणा हवी . त्यांनी प्रत्येक शहराचे नियोजन ठरवत केवळ त्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था कडे द्यावी .

) आगामी ३० वर्षासाठीची प्रत्येक शहराच्या विस्ताराची मर्यादा ठरवून ठेवावी जेणेकरून कुठल्याही शहराचा विस्तार अनिर्बंधपणे होणार नाही

 ) मुळात निर्मिती म्हणजे निर्माण करणे . या अर्थाने सरकारने सध्या बकालपणे विस्तारलेल्या शहरांच्या नादी लागण्यापेक्षा छोटी छोटी नवीन सर्व पायाभूत सुविधांनी परिपूर्ण नवीन शहरे वसवावीत . वर्षात १०० शहरांचे स्वप्न दाखवण्यापेक्षा पुढील २०-३० वर्षात खऱ्या  १०० स्मार्ट सिटी निर्मितीस प्राधान्य द्यावे . यामुळे वर्तमान शहरावरील ताण कमी होऊन ते अधिक बकाल होण्यास पायबंद बसेन .

) तालुका पातळीपासूनचे विकास आरखडे बनवा : नागरीकरणाला दिशा देण्यासाठी दीर्घकालीन धोरण आणि त्या अनुषंगाने उचीत पाऊले उचलणे आवश्यक असते .  गाव असो की महानगर , प्रत्येकाच्या विकासाचा राजमार्ग म्हणजे " नगर रचना योजना " .  १९६६ ला  नगररचना कायदा लागू झाला . प्रश्न हा आहे की , आज ५० वर्षानंतर गावाचा सोडा , किती जिल्हा पातळीवरील प्रादेशिक आरखडा तयार केले गेले आहेत . त्याची अंमलबजावणी तर फार पुढची गोष्ट झाली . झाले ते बस झाले . शासनाने आता सर्वप्रथम प्रत्येक ठिकाणचा म्हणजेच अगदी तालुका स्तरावरील शहरांपासून -महानगरांचा पुढील किमान ३० वर्षाचा टीपी जाहीर करावा आणि त्याची प्रामाणिक आणि पारदर्शक अंमलबजावणी बिगर राजकीय हस्तक्षेपाशिवाय होईल या कडे लक्ष दयावे .

) नगर रचना विभागाचा सर्व डेटा पब्लिक डोमेनवर उपलब्ध करावा जेणेकरून त्यात वारंवार होणाऱ्या अर्थपूर्ण हस्तक्षेपावर अंकुश येईल .

) प्लॉट अलॉटमेंट , इमारत बांधकाम परवानग्या , रस्ते नियोजन या संदर्भातील डेटा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पब्लिक डोमेनवर खुला करणे सक्तीचे असावे .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , danisudhir@gmail.com ९८६९ २२ ६२ ७२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा