THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

अर्थव्यवस्थेत 'अर्थ ' नसताना वेतन आयोगाचा अट्टाहास कितपत व्यवहार्य ?v


  
  ' तिजोरीला न पेलणारा पगारी भार ' या लेखातून मटाने एक महत्वपूर्ण समस्या चर्चेत आणली आहे . कुठल्याही देशाची दिशा आणि दशा हि त्या देशाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठरवत असते . आपल्या देशातील या मंडळींची संख्या जेमतेम २ टक्के . आत्ताच खासदारांना १०० टक्के पगार वाढीचे वृत्त आले आहे . एकूणच विद्यमान परिस्थिती लक्षात घेता  नेते आणि नोकरशहांना 'भस्म्या रोग ' झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . भारताच्या प्रगतील प्रमुख अडचण हे नेते आणि नोकरशहां आहेत हि जनतेची धारणा होण्यामागे याच मंडळीची वर्तवणूक कारणीभूत दिसते .

      एकदा नोकरीला चिकटले की या देशाचे राष्ट्रपती देखील आपणास नोकरीवरून काढू शकत नाहीत या अविर्भावामुळे गेल्या ६ दशकात सरकारी नोकरांमध्ये ' WORKING CULTURE , WORK ETHICS आणि WORK EXCELLENCE ' याचे बीजारोपण होऊ शकले नाही . काम करा अथवा करू नका , प्रामाणिक रहा अथवा राहू नका , कार्यशम असा अथवा नसा वार्षिक पगारवाढ , वेळोवेळी वेतन आयोग 'सब घोडे बारा टक्के ' या सूत्रानुसार सर्वांना लागू होतात . मग काम कशाला करावयाचे ? आयोग हवा परंतु त्याचा लाभ घेताना कार्डपंचिग / बायोमेट्रिकचे मशीन नको, बदल्या नको हि मानसिकता देशाला महासत्ता कशी बनवणार हा संशोधनाचा नक्कीच विषय आहे . 

      देशाची अर्थव्यवस्था हेलकावे खात असताना , २ टक्के लोकांचे लाड करावयाचे की ' देशाच्या भवितव्यास प्राधान्य ' द्यावयाचे याचा निर्णय  देशाचे विद्यमान एकमात्र तारणहार मा . मोदीजींनी करणे क्रमप्राप्त दिसते . जवळपास  ६५ / ३५ ( राज्य / केंद्र )टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर करूनही सरकारी शिक्षण व्यवस्था , सरकारी आरोग्य व्यवस्था जे जे सरकारी ते ते दर्जाहीन असे का याचे उत्तर सरकारने शोधायला हवे.

     उदार अंतकरणाने वेतन आयोग जाहीर करणारे सरकार दुसरीकडे मात्र जगण्यासाठी प्रती दिन ३५ रुपये पुरेसे असल्याचे  कसे काय म्हणते . लोकशाहीतील आर्थिक विषमतेला सरकार स्वतःच खतपाणी घालते हे देशातील उर्वरित ९८ टक्के लोकांचे दुर्दैव ठरते .उन्हात ८ तास करणाऱ्याला ३०० रुपये तर नोकरदारांना ८ तासासाठी (?) ३००० रुपयापेक्षा जास्त या विचारामागाचे लॉजीक जनतेसमोर यायला हवे . ना खाउंगा , न खाणे दुंगा असे ठणकावणारया मोदींनी ' ना " जादा " खिलाउंगा ' हा मंत्र जपणे सुद्धा गरजेचे वाटते . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा