कुठे आहेत त्या
संवेदनशील (?) पालिका ?
मा . पंतप्रधानांनी
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना " वीज बचतीचे " महत्व विषद करताना पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश पुरेसा
असल्यामुळे पदपथावरील दिवे बंद करून विजेची बचत करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे
उदाहरण दिले होते . सुदैवाने त्याच महानगरपालिकेचे तरुण महापौर महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री आहेत . परंतु "वीज बचतीचा आदर्श " ठेवणाऱ्या पालिका
-महानगरपालिका मात्र शोधूनही सापडत नाहीत . उलटपक्षी विजेची वारेमाप उधळपट्टी (वापर
नव्हे ) करण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात चढाओढ लागलेली
दिसते . मुले हि अनुकरणशील असतात त्यामुळे त्यांच्या पुढे उघड्या डोळ्यांनी ' दिसणारे वास्तव ' की मा .
पंतप्रधानांचे बोल खरे मानावयाचे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे .
बदलणारे
ऋतुचक्राप्रमाणे बदलणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ याला सोडचिठ्ठी देत
सायंकाळी ६ ते सकाळी ७ असे पथदिवे चालू ठेवले जातात . मुंबईत साधारणपणे ६० हजार तर
नवी मुंबईत ३३ हजार पथदिवे आहेत . पथदिव्यावरील बल्ब जास्त व्याटेजसचे असल्यामुळे
त्यांना जास्त वीज लागते , त्यात आता नगरसेवकांच्या प्रतिष्ठेचे असणाऱ्या आणि
त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश जनमानसात पाडणाऱ्या हायमास्टची भर पडली आहे .
केवळ मुंबई आणि नवी
मुंबई महानगरपालिकेने पथदिव्यांचे संवेदनशीलपणे नियोजन केले तरी काही हजार युनिट
आणि काही करोड रुपयांची बचत होऊ शकते . मुख्यमंत्र्यांनी लक्ष देत सर्व स्थानिक
स्वराज्य संस्थाना "
आदेश " (अंमल बजावणीसह ) दिले तर
राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बचत संभव आहे . पालिकांनी एलईडी लावून वीजबचतीसाठी
मगरीचे आश्रू गाळण्यापेक्षा पथदिवे टायमरच्या सहाय्याने चालू बंद करण्यासाठी करोडो
रुपयांचे कॉनट्रक्ट देउनही "पथदिवे नियोजनात " अंधार का याकडे लक्ष
द्यावे . उन्हाळ्याचे आगमन झाले आहे , वाढत्या तापमानानुसार विजेचा तुटवडा वाढत
जाणार आहे . ग्रामीण भागाला लोडशेडींग तर शहरात विजेची उधळपट्टी हे असंवेदनशील
चित्र बदलल्यास ग्रामीण भागातील जनतेचे 'अच्छी
रात्र ची ' स्वप्नपूर्ती काही अंशी शक्य होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा