THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ मार्च, २०१५

सार्वजनिक उत्सवातील वीजचोरीलाही मा . न्यायालयाने अंकुश लावावा .




      सार्वजनिक उत्सवातील वीजचोरीलाही मा . न्यायालयाने अंकुश लावावा .


    " मंडपाच्या 'उत्सवा'ला बंदी " हे वृत्त सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे आहे . उत्सवातील राजकीय दबंगगिरीला केवळ आणि केवळ न्यायालयाच अंकुश ठेवू शकते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असल्यामुळे  हा निर्णय म्हणजे सोनाराने कान टोचले म्हणूनच बरे या प्रकरातला आहे . अर्थातच या दबंगगिरीला दाद न देता हा लढा न्यायालयापर्यंत नेणारे डॉ . महेश बेडेकर यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे त्यांचे खास अभिनंदन .
    अर्थातच या निर्णयावरील राजकीय प्रतिक्रिया पाहता आणि वर्तमान राज्य सरकारचा मतप्रवाह लक्षात घेता या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी हि प्रशासनाची तारेवरची कसरत ठरणार हे निश्चित . कदाचीत 'लोकहिताची ' ढालपुढे करत सरकार या निर्णयाविरुद्ध दाद मागेल . सरकारचे बरे असते जे सोयीचे आहे ते न्यायालयाचा निकाल या सबबीखाली झाकून न्यायचे (उदा . सहकारी बँकांना माहिती अधिकार कायदा अनिवार्य नाही ) तर जे गैरसोयीचे आहे त्यासाठी जनहित -लोकहिताची ढाल पुढे करत आव्हान द्यायचे . विन -विन परिस्थिती .

          राजकीय नेते सांस्कृतिक आणि सामाजीक उत्सव या सबबी आड दडत जनतेची सहानुभूती मिळवू पहात आहेत . ' चालू ' उत्सवांचे साजरीकरण लक्षात घेता या उत्सवांमध्ये धार्मिक -सांस्कृतिक आणि सामाजीक या सम सर्वउद्देश कधीच हद्दपार झाले आहेत हे जनतेच्या  ध्यानात आले आहे त्यामुळे  या ' राजकीय अस्तीत्व जतन आणि संवर्धन ' उत्सवांना नागरीक विटले आहेत . मुळात अशा उत्सवांमध्ये सामान्य नागरिकांना कधीच स्थान नसते ,तिथे जत्रा असते ती राजकीय चमचेगिरी करणाऱ्यांची . उत्सव कुठलेही असले तरी ते कोणाला तरी त्रास देत साजरे करणे कोणत्याच संस्कृतीत बसत नाहीत . याला या पूर्वीच आळा बसणे आवश्यक होते .
    याच उत्सवाच्या अनुषंगाने दुर्लक्षित राहिलेल्या मुद्या कडे प्रसारमाध्यमे आणि न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी हा पत्रप्रपंच .  सार्वजनिक उत्सवांना वीजचोरीचे ग्रहण लागले आहे . याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गणेशोस्तव . माहिती अधिकारातून पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे . एकट्या मुंबईत जवळपास ७० टक्के गणेशमंडळे तात्पुरती वीजजोडणी न घेता थेट डीपीतून वीज वापरतात . जे मंडळे वीजजोडणी घेतात त्यांचा वापरही नाममात्रच दिसतो . दिवस-रात्र वारेमाप वीज वापरूनही केवळ ४० /६० युनिट वीज वापर अधिकृतपणे दाखविला जातो . अर्थातच वीज कर्मचाऱ्यांचे हात ओले केले जात असल्यामुळे त्यांचा 'धुतराष्ट्र' झालेला दिसतो . दहीहंडी , नवरात्रोस्तव यासम उत्सवही वीजचोरीचीच री ओढणारे आहेत . अप्रत्यक्षपणे याचा भार पुन्हा जनतेलाच सोसावा लागतो .  सध्या तर अशी परिस्थिती आहे की कुठलाही राजकीय कार्यक्रम असो की व्ययक्तिक कार्यक्रम असो थेट डीपीतून वीज घेणे (चोरी म्हणणे अपमान ठरेल ?) हा हक्कच झाल्यासारखे झाले आहे .  मा . न्यायालयाने या कडे लक्ष देत वीज कंपन्यांना 'वीज चोरी ' रोखण्यासाठी कृतिकार्यक्रम आखण्यास सांगावे .
                       पोलीस विभागाने न्यायालयाचे निर्देशाचे उल्लंघन करणार नाही अशी हमी मंडळाकडून घ्यावी . काही नेत्यांनी या निर्णयास श्रद्धेस ठेच असे केले आहे परंतु नेत्यांनी अशी धूळफेक करण्याआधी न्यायालयाने उत्सवांना बंदी घातली नाही हे ध्यानात घ्यावे . मैदाने भाड्याने घेऊन , मंगलकार्यालये भाड्याने घेत तथाकथीत 'धार्मिक उत्सव ' जरूर साजरे करावेत .                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा