THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

“लढा " पारदर्शक व्यवस्थेसाठी " अंतर्गत निवेदन ”

                          “लढा " पारदर्शक व्यवस्थेसाठी " अंतर्गत निवेदन

                               (AN APPEAL BY CITIZEN FOR TRANSPARENT SYSTEM)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रती ,
मा . मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .
विषय ……तर भविष्यात मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणार नाही !
 महोदय ,
    घटनेने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे आणि त्याचा वापर करणे हे माझे परमकर्तव्य आहे याची मला जाण आहे परंतु केवळ निवडणुकीत मतदानाचा अधिकार म्हणजे लोकशाही नव्हे ना ? गेल्या काही वर्षात ग्रामपंचायत ते महानगरपालिका पर्यंतच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थातील अनियंत्रित--अनियोजित आणि अपारदर्शक कार्यपद्धत्तीमुळे या संस्था स्थापनेच्या उद्दिष्ट्पुर्तीपासून कोसो दूर जात असल्यामुळे  त्यांना शब्दशः "लुटीचे स्वरूप " आले आहे . ब्रिटिशांनाही लाजवेल अशी लुट चालू आहे मान्यायालयांनीही यावर अनेकवेळा ताशेरे ओढली आहेत . प्रसारमाध्यमांनीही या संस्थांमधील अनागोंदी , भ्रष्टाचार यावर प्रकाशझोत टाकला आहे परंतु परिस्थिती अधिकाधिक गंभीर होते आहे . झाले ते पुरे झाले ! अशी आता आम्हा जनतेची धारणा आहे .
      जनतेसाठीच  असणाऱ्या या संस्थातील अपारदर्शक कार्यपद्धत्तीमुळे जनतेच्या नाकावर टिच्चून जनतेच्याच करोडो रुपयांच्या निधीचा अपव्यय केला जातो आहे . आम्ही नागरीक हतबल आहोत . हे थांबणार का ? आणि थांबणार असेल तर कधी ? हा आता खरा आमचा प्रश्न आहे . केवळ मतदानापुरती संकुचित लोकशाही हि एक प्रकारच्या 'हुकुमशाहीचेच ' स्वरूप ठरते . सामाजिक बांधिलकी ,नैतिकता , कर्तव्याचे भान आणि जाण , घटना -कायद्याप्रती आदर , या सम लोकशाहीस पूरक गुणांचे सर्वपक्षीय अध:पतन झाल्यामुळे आता   केवळ व्यक्ती किंवा पक्ष बदलून परिस्थितीत बदल असंभव दिसतो . सक्षम पारदर्शक व्यवस्थेची निर्मिती हाच यावरील सर्वोत्तम एकमात्र पर्याय संभवतो .
   महोदय , लोकशाहीत लोकांचा सहभाग हा लोकशाहीचा गाभा म्हटला जातो परंतु वर्तमानात आम्हा नागरिकांना मतदानाव्यतिरिक्त कोणताच अधिकार नाही . पुन्हा -पुन्हा त्याच त्या कामावर खर्च केला जातो . अनावश्यक कामे केली जातात . अपारदर्शक कार्यपद्धत्तीमुळे कुठले कामे केली जातात हे सुद्धा जनतेस कळत नाही . ग्रामपंचायतीला शासनाने कोणत्या योजनेसाठी किती निधी दिला हे कोणालाच कळत नाही . तळे राखी तो पाणी चाखी अशी अवस्था झाल्यामुळे या निवडणुकांत 'लाखो -करोडोंची ' इन्व्हेस्टमेंट करायला उमेदवार तयार असतात कारण त्यांना परताव्याची खात्री () असते.
लोकशाहीतील सर्वच घटकांना या संस्थातील गैरप्रकारांविषयी माहिती आहे .  तरीही सर्व हतबल आहेत . प्राप्त परिस्थितीचे सर्वांगीण विचार करता या संस्थांच्या सर्व व्यवहारात पारदर्शकता आणणे हाच एकमात्र उपाय संभवतो . आपण याचा त्वरीत विचार करावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थात पराकोटीची पारदर्शकता आणण्याचे निर्देश द्यावेत
आम्हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या या संस्थांच्या सर्व बाबतीत जसे धोरणात्मक , आर्थिक पारदर्शकता हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे आणि तो आम्हास मिळायला() हवा . जर आगामी ६ महिन्यात आपण लुटीचे केंद्रे ठरणाऱ्या संस्थात पारदर्शकता आणली नाही तर मी कधीही या निवडणुकात मतदान करणार नाही . केवळ मतदानापुरती लोकशाही अभिर्प्रेत नाही आणि आमची त्यास मान्यता नाही .
          मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे म्हटले जाते परंतु त्याच बरोबर दान सत्पात्री असावे अशी आपली संस्कृती सांगते . विद्यमान परिस्थितीत  मात्र अपारदर्शक कारभारामुळे मतदान करणे म्हणजे " लुटीत सहभाग " असा होतो आहे . महापौर -आयुक्त वा कोणालाही संपर्क केल्यास उत्तरच मिळत नाही . मग मतदान तरी का करावे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे . व्यवस्था परिवर्तन हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सरकार जर ते टाळत असेन तर किमान 'मतदान ' न करून विद्यमान लुटीस विरोध दर्शविणे एवढेच आम्हा नागरिकांच्या हातात पर्याय उरतो आणि त्याच मार्गाचा मी स्वीकार करत आहे .
          सकारात्मक कृतीच्या प्रतीक्षेत ! चूकभूल द्यावी ,घ्यावी !!  धन्यवाद !!!
                                                                                                                                                        कळावे ,

 
                                                                                                                                               आपला मतदार ,
                                                                                                       नाव :

 
 


                                                                                     पत्ता : (अनिवार्य नाही)

 
 


                                                                                               दूरध्वनी क्रमांक :
संकल्पना सौजन्य : सुधीर लक्ष्मीकांत दाणी , ९८६९२२६२७२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा