THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

चिंता लोकशाहीची : डिजीटल इंडियात अडाणी -अशिक्षित उमेदवारांचा बोलबाला ! लोकप्रतिनिधींना शिक्षणाचे वावडे का ?

 

                          आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा परिचय वर्तमान पत्रातून प्रकाशित होत आहे . यावर "डोळसपणे " नजर मारली तर हि गोष्ट प्रकर्षाने समोर येते की , काही अपवादातमक उमेदवार सोडले तर बहुतांश उमेदवार हे शैक्षणिक दृष्ट्या अगदीच १० वी /१२ वी च्या आत आहेत

              एकुणातच अन्य क्षेत्रात "शिक्षण " हि पात्रता असते तशी राजकारण्यांसाठी "शिक्षणाचा अभाव " हीच प्रमुख पात्रता आहे की  काय अशी स्थिती आहे . 

               बरे हा प्रकार केवळ ग्रामीण भागापुरताच मर्यादित आहे असे नाही तर अगदी पुरोगामी महाराष्ट्राची राजधानी , देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील उमेदवार , २१ व्या शतकातील शहर असा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबईतील उमेदवार , एवढेच नव्हे तर शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील उमेदवार यांच्या शैक्षणिक पात्रतेचा स्तर देखील जेमतेमच आहे . एकीकडे अगदी पोलीस , सुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी देखील उच्च शिक्षित उमेदवार अर्ज करताना दिसतात तर दुसरीकडे राज्य -शहराचा कारभार ज्यांच्या खांद्यावर असतो ते मात्र अल्प शिक्षित असल्याचे दिसते . केवढी हि विसंगती .

                          " मुलगी शिकली ,प्रगती झाली "  असा संदेश देणाऱ्या राजकारण्यांना हाच संदेश स्वतः साठी लागू करण्याचे धाडस का होत नाही ? हा प्रश्न अनुत्तरित आहे .      " मुलगी शिकली ,प्रगती झाली "   हे सूत्र रास्त मानले तर  अशिक्षित लोकप्रतिनिधी हे राज्याच्या ,देशाच्या अधःपतनास कारणीभूत आहेत असे म्हटले तर ते अयोग्य -गैर ठरणार नाही .

                    सरकारला थेट प्रश्न हा आहे की , जर ट्रक ड्रॉयव्हर होण्यासाठी किमान  शैक्षणिक अर्हता सुनिश्चित केली जात  असेल तर त्याच पद्धतीने सरपंचापासून ते आमदार -खासदारांसाठी किमान शैक्षणीक पात्रतेची अट घालण्यास नेमकी कोणती अडचण आहे ? देशाचं कारभार चालवणे आणि शिक्षण याचा संबंध नसतो का ? शिक्षण असणारे लोकप्रतिनिधी असल्यास कारभार चालवण्यास अडचण निर्माण होते अशी परिस्थिती असल्याने लोकप्रतिनिधी साठी  किमान शैक्षणिक पात्रतेची अट टाकण्यास सरकार , राज्य  -केंद्रीय निवडणूक आयोग धजावत नाही का ?

                राजकारण आणि शिक्षण याचे विळ्या भोपळ्याचे नाते असण्यामागचे नेमके कारण काय ?  याबाबत लोकशाहीची चिंता त्यावर चिंतन करणाऱ्या घटकांनी , लोकशाहीच्या चार ही  स्तंभांनी खुलासा करावा .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

बेलापूर , नवी मुंबई .

1 टिप्पणी:

  1. यावर सर्व जनतेने नोटा वापरून सर्व उमेदवारांना नाकारणे हाच एक उपाय आहे

    उत्तर द्याहटवा