THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

स्थापनेची उद्दिष्टपूर्ती संपुष्टात आल्याने नवी मुंबईतून सिडकोचे " विसर्जन " काळाची गरजनिकडीचे !!!

  

                          निर्मितीची उद्दिष्टपूर्तीची पूर्तता  झाली किंवा उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासला जात असेल तर त्याचे विसर्जन करणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय ठरतो हा व्यवहारातील नियम आहे .  हा नियम सर्वानांच लागू पडतो . मग ती व्यक्ती असो की  संस्थाज्या हेतूने निर्मिती केली गेली आहे त्याची परिपूर्ती संपन्न झाली की पुढे  त्या निर्मितीच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही

                    मुद्दा मांडण्यामागचा मतितार्थ समजून घेण्यासाठी कोविड  काळात तातडीने बांधलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय करोना सेंटरचे देता येईल . उपलब्ध असणारी वैद्यकीय सुविधा पुरेशी नसल्याने करोडो रुपये खर्च करून ' तात्पुरत्या स्वरूपातील कोविड उपचार केंद्र बांधले होते . कालांतराने करोना संपला त्या कोरोना सेंटरची गरज संपली म्हणून त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला . कोविड सेंटरचे विसर्जन करण्यात आले .

              

              मुद्दा लक्षात आलाच असेल . हाच नियम सिडकोला देखील लागू पडतोमुंबई शहराला पर्याय  म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करणे या उद्दिष्टपूर्तीसाठी सिडकोची स्थापना ७० च्या दशकात केली गेली होती  . शेतकऱ्यांच्या , भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊन सिडकोने नवी मुंबई हे शहर वसवले . पायाभूत सुविधा निर्माण केल्या  .  १९९२ ला नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना केली गेल्याने सिडकोने शहरातील पायाभूत सुविधांसह शहराचा कारभार पालिकेकडे हस्तांतरित केला .त्याला देखील आता उणेपुरे ३२ वर्षे झालेली आहेत .  

                     याविषयी दुमतच संभवत नाही की  सिडकोने नवी मुंबईचा विकास केला आहे , एका चांगल्या शहराची निर्मिती केलेली आहे .  प्रश्न आहे तो वर्तमानात नवी मुंबई शहरात सिडकोचे असणे आवश्यक आहे का  ?  सिडको निर्मिती उद्दिष्टपूर्ती पूर्ण झालेली आहे . शहर वसवले गेले आणि त्याचा कारभार आता पालिका पाहत आहेत्यामुळे आपसूकच प्रश्न उरतो की  आता नवी मुंबई शहराला सिडकोची आवश्यकता आहे का ? .... तर याचे थेट उत्तर आहे ... नाही ... नाही ...नाही ... अजिबातच नाही !   

            राज्यातील अनेक शहरांचा कारभार महानगरपालिका सांभाळत आहेतत्यामुळे  नवी मुंबई शहराला सरकारी यंत्रणांची  आवश्यकता  असण्याची बिलकुल गरज नाही  ! 

            " रिकामे मन कुविचाराचे धनआणि  " निष्क्रिय मन म्हणजे  सैतानाची  कार्यशाळा " अशा अर्थाच्या म्हणी आणि सिडको यात वर्तमानात सुसंगती दिसतेसिडकोला वर्तमानात काम उरलेले नसल्याने सिडको नको ते "उदयॊग  " करू लागलेली दिसते . याचे ताजे उदाहरण म्हणजे  "सिडकोचा खासदार ,आमदार , सनदी अधिकाऱ्यांसाठी  महानिवास गृहप्रकल्प ".   

                हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . त्याच बरोबर सामाजिक भूखंड सेवा अंतर्गत "अर्थपूर्णपद्धतीने  भूखंड  तथाकथित सामाजिक संघटनांना वाटणे / भूखंड वाटून घेणे. सिडकोचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असेल तर सिडकोने गेल्या २० वर्षात विविध सामाजिक योजनांतर्गत वाटलेल्या भूखंड वितरण केलेल्या संस्थांची यादी आणि त्या संस्थांचे सदस्य /अध्यक्ष याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी . सिडको प्रशासनाचा दृष्टिकोन पाहता हे शक्य वाटत नाही कारण सिडको अगदी आरटीआय अंतर्गत विचारलेली माहिती देखील देण्यास टाळाटाळ करते . गुप्त कारभार पद्धती हि भ्रष्टचाराची जननी असते आणि सिडको प्रशासनाला गुप्त कारभार पद्धतच अत्यंत प्रिय आहे .

                  जुन्या इमारतींना  "अर्थपूर्ण पद्धतीने ओसीदेणेभूखंड विक्रीतून स्वतःची घरे भरणे , अयोग्य पद्धतीने टीडीआर वाटपमँग्रोज ला हानी पोहचवून , खाडी बुजवून , पारसिक हिल , बेलापुर हिल ला हानी पोहचवत , निसर्गाला -पर्यावरणाला हानी पोहचवत भूखंड निर्माण करणे  , ट्रान्स्फर चार्जेसच्या नावाखाली नागरिकांची लूट करणे , विविध प्रकारच्या एनओसी देण्यासाठी नागरिकांची आर्थिक लूट करणे असे अनेक उद्योग सिडको करताना दिसते आहे  . अशा उदयॊगा मागचे प्रमुख कारण म्हणजे "सृजनशील , सकारात्मक " कामेच उरलेली नाहीत .

 

               वर्तमानात सिडकोचे  प्रशासनाचा दृष्टिकोन हा समाजहिताचा राहता तो केवळ आणि केवळ व्यवसायीक झाल्याने  भूखंडाचे  श्रीखंड हा दृष्टिकोनातून  आर्थिक लूट हाच सिडकोच्या कारभाराचा आत्मा झालेला असल्याने आता गरज आहे ती सिडकोच्या विसर्जनाची !

       एकुणातच सर्व परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांचे अत्यंत स्पष्ट मत आहे की  , नवी मुंबईतील  सिडकोच्या स्थापनेची उद्दिष्टपूर्ती सफळ संपूर्ण झालेली आहे . सिडकोचा वर्तमानातील कारभार हा उद्दिष्टपूर्ती ला हरताळ फासणारा आहे... सिडको उद्दिष्ट पूर्तीपासून दूर जाते आहे.. त्यामुळे आता  थेट गरज आहे ती सिडकोचे विसर्जन करण्याची !  

           अनेक जणांचा दावा असेल की  सिडकोच्या वतीने आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती , मेट्रो असे प्रकल्प सुरु आहेत . अगदी मान्य ! पण हि गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे की  सिडकोचा  सदरील  उपक्रमात निधी देण्याव्यतिरिक्त थेट ,प्रत्यक्ष सहभाग दिसत नाही . ज्या सिडकोला  स्वतःच्या गृह प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा सल्लागार आवश्यक असतो , स्वतः बांधलेली घरे विकण्यासाठी एजेंट ची गरज पडते ती सिडको विमानतळ उभारणीत कोणते योगदान देऊ शकते हा संशोधनाचा विषय आहे .

         सिडकोचे विसर्जन हे मत मान्य नसेल त्यांनी एकदा सिडकोचा कारभाराचा एजेंट लावता अनुभव घ्यावा , सिडकोच्या प्रशासकीय कामकाज पद्धतीकडे डोळसपणे पहावे . लाचखोरी ,भ्रष्टाचार या आणि याच तत्वावर वर्तमानात सिडकोचा कारभार "चालू " आहे हे नागडे सत्य आहे . सिडको प्रशासनाचा नैतिक ऱ्हास इतका झालेला आहे की  , अगदी निवृत्त झालेले अधिकारी उघड उघड निवृत्तीनंतर कार्यालयात येऊन फाईल मंजूर करण्याचे कृष्णकृत्य करतात .

 

     आता सिडकोला सिंगापूर निर्मितीची संधी द्या :

 

 मा . पंतप्रधानांनी सिंगापूर दौऱ्यावर असताना भाष्य  केले आहे की  , भारतात आम्हाला अनेक सिंगापूर निर्माण करावयाचे आहेत . राज्य सरकारने  देशाच्या पंतप्रधानांच्या स्वप्नपुर्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी नवी मुंबईतील सिडकोचे विसर्जन करून सिडकोला  राज्यात अन्य ठिकाणी जमीन देऊन 'सिंगापूर निर्मिती" साठी धाडून द्यावे .

 


 

 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

बेलापूर नवी मुंबई .

danisudhir@gmail.com 9869226272

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा