भारतातील
लोकशाहीची वाटचाल हळू हळू
"लोकप्रतिनिधी शाही " कडे होत
असल्याचे अधोरेखित करणारा निर्णय
म्हणजे वर्तमानातील सरकारचा ग्रामपंचायतीवर
खाजगी व्यक्तीची प्रशासक
नियुक्त करण्याचा सरकारचा निर्णय .
आपल्या
खाजगी 'दुकानात ' कुठल्या मुनीमजीची
नियुक्ती करावयाची हा जसा
त्या दुकान मालकाचा
'खाजगी वैयक्तिक हक्क ' असतो
त्याचा धर्तीवर सरकार ग्रामपंचायतींना
आपले 'खाजगी वैयक्तिक
मालमत्ता ' समजत
खाजगी व्यक्तीची नियुक्ती
करताना दिसते आहे . हा
प्रकार अत्यंत निंदनीय आहे
आणि लोकशाहीची टाळेबंदी करणारा असल्यामुळे सजग नागरीकांनी
, बुद्धिवादी मंडळींनी, गावातील नागरीकांनी या
विरोधात आवाज उठवायला
हवा .
गेल्या काही
वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा
कारभार पाहता असे म्हणता येईल
की , निवडणुका म्हणजे
आगामी ५ वर्षाच्या
काळासाठी जनतेची
" सरकार मान्य पद्धतीने लूट
करण्याचा परवाना " कोणाला द्यायचा यावर
शिक्कमोर्तब करणे .
करोना परिस्थितीमुळे
सध्या निवडणुकांच्या पद्धतीने लुटीचा परवाना
देण्याचा मार्ग बंद झालेला
असल्यामुळे सरकारने ती निवड
करण्याचा अधिकार स्वतःकडेचघेतलेला दिसतो
. " प्रशासकांच्या
आडून ग्रामपंचायतीच्या तिजोरीचा
संघर्ष " सदरील निर्णयामागे दिसतो
. हा ना राजकीय
संघर्ष आहे , ना विकासासाठीचा
संघर्ष आहे . हा संघर्ष
आहे तो ग्रामपंचायतीला
मिळणाऱ्या निधीवर कोणी 'हात
' मारायचा याबाबतचा .
ग्रामविकास
मंत्री म्हणतात की ग्रामीण भागातील विकासकामे
थांबू नयेत
म्हणून नाईलाजाने खाजगी प्रशासक
नेमावे लागत आहेत
. हा प्रकार म्हणजे
ताकाला जाताना गाडगे लपवण्याचा
प्रकार आहे . मंत्री महोदयांना
ग्रामीण विकासाबाबत
एवढी काळजी असेल
तर त्यांनी ज्या
ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक
नेमणार आहेत त्या
त्या ग्रामपंचायतीत गेल्या
५ वर्षात कोण
कोणकोणती विकास कामे झाली
, त्यासाठी किती निधी
खर्च केला गेला
, काम करणारे कंत्राटदार
कोण होते याची
माहिती पब्लिक डोमेनवर टाकावी
म्हणजे 'दुभती गाय सदृश्य
ग्रामपंचायतीत केल्या गेलेल्या निधी
खर्चामुळे कोणाचा विकास झाला
हे सहजपणे सर्वांच्या
ध्यानात येईल .
खाजगी
व्यक्तीच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या
विविध राजकीय पक्षानी
केवळ याबाबतीत मगरीचे
आश्रू न गाळता
थेट न्यायालयाची पायरी
चढावी . तोंड देखला
विरोध करू नये
.
सर्वात
महत्वाचे हे की
, संबंधित मंत्री महोदयांनी व
मुख्यमंत्री महोदयांनी अशी नियुक्ती
करण्याची तरदूत "ग्रामपंचायत कायदा
१९५८' "अधिनियमात नमूद केलेली
आहे का ?
ग्रामपंचायत
सदस्य -सरपंच , पंचायत समिती
सदस्य -सभापती , जिल्हापरिषद सदस्य
-अध्यक्ष हि पदे
म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची
जनतेच्या पैशातून उदरनिर्वाहाची सोय
लावण्याचे पदे आहेत
या दृष्टीने सर्वच
राजकीय पक्ष पाहताना
दिसतात . तुझा हि
' विकास' कर
व त्यातून पक्षाला
देखील मोठे कर
हा त्यामागचा 'शुद्ध
हेतू ' असतो हे
आता लपून राहिलेले
नाही .
ग्रामपंचायती
या सरकारच्या वा
पालकमंत्र्यांच्या खाजगी जहागिऱ्या नाहीत
. परंतू वर्तमान निर्णयावरून तरी
सरकारने त्या आपल्या
खाजगी जहागिऱ्या असल्याच्या
थाटात खाजगी व्यक्तीची
प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा
घाट घातला आहे
. हा निर्णय पूर्णतः
लोकशाही विरोधी आहे . या
मुळे ज्या ठिकाणी
सरकार खाजगी व्यक्तीची
प्रशासक म्हणून नियुक्ती करेल
त्या ठिकाणच्या नागरिकांनी
थेट ग्रामपंचायतीला टाळे
ठोकण्याचा निर्णय घ्यावा .
खाजगी व्यक्तीची नियुक्ती करताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे .
आज
जर नागरीक शांत
राहिले भविष्यात असाच पायंडा
पडेल व भविष्यात
स्थानिक लोकप्रतिनिधी येनकेन प्रकारे निवडणुका
टाळत 'आपला माणूस
"प्रशासक म्हणून नेमून ग्रामपंचायतीची
लूट करतील . व्यक्ती
खाजगी असेल तर
त्याचे उत्तरदायित्व कसे 'फिक्स
' करणार ? अपहार केला तर
कोणत्या नियमांतर्गत कारवाई करणार
? अपहार केलेला जनतेचा पैसा
कसा वसूल करणार
? ... असे अनेक प्रश्न
आहेत . लोकशाही व्यवस्थेत चुकीचा
पायंडा पडून नये
म्हणून नागरीकांनी जागृत राहत
ग्रामपंचायतीला थेट टाळेच
ठोकावे . असे हि
ग्रामपंचायती उघड्या राहून ५
वर्षात किती विकास
झाला हे त्या
त्या गावातील नागरिक
जाणतातच .
स्थानिक
स्वराज्य संस्थातील सर्व कंत्राटदार
हे लोकप्रतिनिधी वा
त्यांचे सगेसोयरे वा बगलबच्चे
असतात . त्यामुळे ग्रामपंचायत ,पंचायत
समिती व जिल्हा
परिषदेची कामे हि
आपलाच अधिकार असल्याचे
मानून हि कंत्राटे
वाटून घेतली जातात
. कामाचा दर्जा त्यामुळे बिलकुल
राखला जात नाही
. आजवर करोडो रुपये खर्च
करून सुद्धा किती
ग्रामपंचायतींचा विकास झाला हे
एकदा शासनाने "डोळसपणे
"पहावे . सर्व ग्रामपंचायतींना
सर्वसाधारणपणे सारखाच निधी मिळतो
तरी देखील केवळ
५/१० ग्रामपंचायतीचा
विकास होतो तर
बाकी आहे तशाच
का राहतात याची
देखील पडताळणी व्हायला
हवी.
सर्वात महत्वाचे म्हणजे , महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने देखील या सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे . सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री . दत्ता काकडे यांनी सर्वानुमते याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे .
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे , लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवला जाणारे प्रसारमाध्यमे मात्र यावर कुठलाच आक्षेप नोंदवताना दिसत नाहीत , निर्णयाला विचाराने विरोध करताना दिसत नाही .
भारतीय लोकप्रतिनिधी यांच्या
उक्ती आणि कृतीत टोकाची विसंगती असते .
पारदर्शकता , भ्रष्टाचारमुक्त प्रशासन , शिस्तबद्ध -लोकाभिमुख कारभार याची दवंडी पिटली जात असली तरी तरी
प्रत्यक्षात अशी प्रामाणिक भावना कोणत्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नसते. मुळात एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी
सत्य आहे की , वर्तमानातील स्थानिक स्वराज्य संस्था
या केवळ आणि केवळ 'लुटीच्या संस्था ' झालेल्या आहेत .
पारदर्शकतेच्या
स्वप्नपूर्तीसाठी :
- · स्थानिक स्वराज्य संस्थातील "गैरप्रकार पाहता " भविष्यात सर्व ग्रामपंचायतींना आपला आर्थिक लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकणे अनिवार्य करावे .
- · स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व कंत्राटे 'ऑनलाईन ' पद्धतीनेच करणे अनिवार्य असावे . यासाठी राज्य सरकारने एक पोर्टल निर्माण करावे आणि या पोर्टलच्या माध्यमातूनच टेंडर द्यावीत . असे केल्यास स्थानिक पातळीवरील अधिकारी -कंत्राटदार -पुढारी यांच्यातील 'अर्थपूर्ण ' युतीला पायबंद बसू शकेल .
- · स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व कामांचे जिओ टॅगिंग करावे आणि कामाच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करूनच बिले अदा करावीत .
सुधीर
लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर ,नवी
मुंबई

Need of Hour.. Right
उत्तर द्याहटवा