लोकशाहीच्या
अध:पतनात
मतदारांचा वाटा सिंहाचाच !!!!
स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या विकासात वाटा
कोणाचा ? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रत्येक राजकीय
पक्षात अहमिका दिसते परंतु विद्यमान लोकशाहीच्या अध:पतनास जबाबदार कोण हे सांगताना
मात्र केवळ
एकमेकाकडेच बोट दाखविण्यात धन्यता मानली जाते . सरपंच ते खासदार या
लोकप्रतिनिधींच्या
खाबुगिरीवृत्तीमुळे
वर्तमान " लोकशाही " व्यवस्थेला " लूटशाहीचे " स्वरूप आले
आहे. प्रामाणिक
लोकप्रतिनिधी हि जमात काही सन्माननीय अपवाद वगळता नामशेष होण्याच्या
मार्गावर आहे .
लोकशाहीच्या
व्याखेनुसार गेल्या ६ दशकात लोकशाहीची स्वप्नपूर्ती झाली का ? या प्रश्नाचे उत्तर पूर्णत: होय
किंवा नाही असे
असले तरी एक गोष्ट नक्की की विद्यमान लोकशाहीच्या अध:पतनात
मतदारांचा सिंहाचा वाटा
आहे .
न्यायव्यवस्था , प्रसारमाध्यमे , विधिमंडळ आणि प्रशासन हे लोकशाहीचे ४ स्तंभ . या चार
स्तभांची
जनतेच्या मनातील विश्वासार्हता हा खरा लोकशाहीचा मुख्य स्तंभ . दुर्दैवाने मा .
न्यायालयांचा अपवाद आणि काही अंशी प्रसारमाध्यमे वगळता अन्य २ स्तंभाबाबत जनतेच्या
मनात
विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे वास्तव मान्य करावे लागेल. सर्वात
महत्वाचे हे की राज्यकर्ते
आणि प्रशासन यांचा थेट संबंध लोकशाहीच्या यशापयशासी
असतो . प्रशासनाची दोरी पूर्णपणे
राज्यकर्त्यांच्या हातात असते तर राज्यकर्त्यांची
दोरी पूर्णपणे मतदारांच्या हातात असते आणि त्यामुळेच
सुदृढ , निकोप लोकशाहीचे भवितव्य हे केवळ मतदारांच्या एका बोटाच्या हालचालीवर
अवलंबून असते .
कोणावर अंकुश ठेवण्यासाठी असणारी दोरी जर ती स्वतःच्या गळ्यास
गळफास लावून
घेण्यासाठी वापरली जात असेल तर त्याचे खापर अन्य घटकांवर फोडण्यात
काहीच हशील असत नाही .
लोकशाही की लुटशाही :
आपल्याकडे लोकशाहीचा
डंका पिटला जात असला तरी वस्तुत: घराणेशाही ,
सरंजामशाही
हा आपल्या व्यवस्थेचा स्थायीभाव बनला आहे . १०० कोटी लोकसंखेच्या देशात अर्धा काळ
पंतप्रधानपद एकाच कुटुंबाकडे आहे. लोकशाहीचा शिक्कामोर्तब करत आज आपल्या विभागाचे
अनेक
संस्थानिक झाले आहेत . साचलेपण आले की गढूळता येते हा निसर्गाचा नियम आहे .
लोकशाही व्यवस्था प्रवाही न राहता त्याला साचले पण आले आहे , सत्तेचे साचलेपण आल्यामुळे
लोकशाहीचा ' विचका ' झाला
आहे हे मान्यच करावे लागेल . ज्यांना लोकांनी विश्वासाने निवडून दिले
त्यांनीच
सहकारी बँका बुडीत काढाव्यात , लाखो गरिबांची
ठेव दावणीला बांधावी ,
सहकाराच्या नावाखाली
सहकारी साखर कारखाने स्वतःच्या घशात घालावीत ,
शिक्षणाच्या
नावाखाली सामान्य जनतेची लुट करावी , बाजार
समितींच्या गोंडस नावखाली शेतकऱ्यांचे रक्त
प्यावे , स्थानिक स्वराज्य संस्थांनी उघडपणे जनतेच्या पैशाचा अपव्यव करावा , सरकारनेच लुटीचे
'टोलनाके ' उभा
करावेत हीच लोकशाही आपल्याला अभिप्रेत होती का ? केवळ मतदार निवडून देतात
म्हणून या 'लुटशाहीला ' " लोकशाही "
शाही संबोधणे न्यायपूर्ण आणि संयुक्तिक ठरते का ? एक गोष्ट
सर्वांनी मान्य करायला हवी की लोकशाही असली तरी आपल्या
डोळ्यादेखत पैशाचा अपव्यय होत असेल
तर त्या विरोधात आवाज उठवायचे स्वातंत्र्य आहे
का ? स्थानिक नेते लगेचच ' गाडण्याची ' भाषा
करतात
हे सर्वज्ञात आहे .माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या होणाऱ्या हत्या याचे
सर्वोत्तम उदाहरण होय . आज
वास्तव असे आहे
की ' लोकशाहीचा
केवळ आभास ' आहे . प्रत्यक्षात लोकशाहीची बीजे रुजलीच नाहीत
हे
उघडपणे कोणी मान्यच करत नाही म्हणूनच लोकशाहीची झाकली मुठ आजवर झाकलेली आहे .
राजकारणाची सफाई
मतदारांच्याच हातात :
लोकशाहीला लुटशाहीचे स्वरूप
आले आहे कारण भारतीय मतदार सुज्ञ नाहीत. तसे नसते तर
सहकाराची लुट करणाऱ्यांना , जनतेच्या ठेवी बुडविणाऱ्याना , सत्तेत राहून केवळ आणि केवळ जनतेची लुट
हे धोरण
अवलंबविनारयाना पुन्हा पुन्हा संधी दिली नसती . जेवढे मतदान न करणारे दोषी आहेत
तेवढेच
"चुकीच्या " व्यक्तीला मतदान करणारे दोषी ठरतात . आज सरपंचापासून
ते खासदारांपर्यंत प्रत्येक जण
छाती बडवून विकास केल्याचे सांगतात , मग प्रश्न हा निर्माण होतो की हा विकास जनतेला
दिसत
का नाही . जनतेला विकास दिसतो तो राज्यकर्त्यांचा , निवडणूक अर्ज
भरताना दिलेली संपत्तीची आकडेवारी
( केवळ अधिकृत ) हेच अधोरेखीत करते . गेल्या ६७ वर्षात
देशाच्या राजधानी सहित अनेक
भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही , या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट
ती कोणती ? कृषिप्रधान देशात युद्धात शहीद
झालेल्या सैनिकांपेक्षा आत्महत्या
केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कितीतरी पट आहे . मग देशाचे खरे शत्रू
कोण हा प्रश्न
अनुत्तरितच राहतो .
भारतीय मतदार मग तो झोपडपट्टीतला
असो की व्हाईट कॉलर मतदार असो इतर वेळी कितीही सुज्ञ
पणाचा आव आणत असला तरी
प्रत्यक्ष मतदान करताना जात-पात , धर्म-पंथ , भावकी यासम भावनीक
गोष्टींना बळी पडतोच . या मुळेच भ्रष्ट सत्तापिपासू
राजकारण्याचे फावते. लोकशाहीच्या अन्य
कोणत्याही स्तभांपेक्षा अधिक सक्षमपणे , जलदपणे राजकारणाची सफाई मतदार करू शकतात .
या
साठी त्याला आजवर त्याला वेढलेल्या सर्व भावनिक चक्रव्युवातून सर्वप्रथम बाहेर
पडले पाहिजे .
आगामी ५ वर्षाचा स्वतःचा एक जाहीरनामा ठरवावा लागेल आणि तो म्हणजे
येत्या ५ वर्षात
ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या सर्व निवडणुकात ' डोळसपणे ' मतदान
करत प्रस्थापीत घराणेशाही ,
भ्रष्टाचार , गुन्हेगारी , अशिक्षीत (शिक्षण महत्वाचे आहेच !) अशी पार्श्वभूमी असणाऱ्या सर्व
घटकांना एकदा
'जोर का धक्का ' देत घरी बसविणे . मतदारांनी असे ठरवले तर विद्यमान सर्वच पक्षातील ६०
ते ७० टक्के
उमेदवार बाद होतील आणि ती काळाची गरज आहे . तुम्हाला बाग फुलवायची
असेल तर प्रथम
साफसफाई अनिवार्य ठरते . असे केले तरच लोकशाहीची स्वप्नपूर्ती शक्य
आहे अन्यथा २०/२५ वर्षानंतर
लोकशाहीच्या
पालखीचा केवळ मतदाना पुरता भोई एवढेच नागरिकांची भूमिका उरेल . प्रसार माध्यमे
आणि न्यायालये त्यांच्या
परीने राजकारणाचा अजेंडा पुढे नेत असली , राजकारणाच्या
साफसफाईचे
धनुष्य उचलत असली तरी त्यांना अंगभूत मर्यादा आहेत हे मान्य करावे लागेल
.
वर्तमान जाहीरनामे फसवेच : आज देशापुढील सर्वात मोठी समस्या हि 'अनियंत्रित
लोकसंख्या आणि दर्जेदार शिक्षणाचा
अभाव ' आहे
. बेरोजगारी ,
वाढती गुन्हेगारी , गरिबी , झोपडपट्ट्या
,
अपुरे जीवनमान , भ्रष्टाचार , महागाई , कुपोषण-भुकमार , पर्यावरणाचा ऱ्हास , उर्जेचा तुडवडा , महागाई ,
निरक्षरता , नक्षलवाद , जागेचा
तुडवडा , निसर्गावर अतिक्रमण या सम बहुतांश समस्यांचे
मूळ हे
'अनियंत्रित लोकसंख्या आणि दर्जेदार शिक्षणाचा
अभाव ' आहे
. दुर्दैवाने १०० वर्षाचा इतिहास
असणारा पक्ष असो की पार्टी विथ डिफरन्स सांगणारा
पक्ष असो , देशातील सर्वच पक्षाच्या जाहीरनाम्यात
याचा
उल्लेखही नसतो . सर्वच जाहीरनामे केवळ फसवे आणि दिशाभूल करणारे . निकोप
लोकशाहीसाठी आता जाहीरनामे ही संकल्पना पूर्णपणे मोडीत काढली पाहिजे
आणि ज्यांनी
सत्ता उपभोगली आहे किमान त्यांना तरी आजवर काय केले त्याचा लेखाजोखा देणे अनिवार्य
करावे . प्रसारमाध्यमे यात अतिशय मोलाची भूमिका पार पडू शकतात परंतु त्यांचीही 'दिशा '
गेल्या
काही वर्षात भरकटली आहे , अर्थातच याला
सन्मानीय अपवाद आहेतच .
जे बोट मतदान करताना चुकीच्या ठिकाणचे बटण
दाबते त्या बोटाला भविष्यात तेच बोट पुढे
पुढे
करत तक्रार करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार उरत नाही . मतदार
राजा (?) वेळीच जागा हो !
अजूनही वेळ गेली नसली तरी आता
थोडाच वेळ तुझ्या हातात आहे . शेखचिल्ली सारखा ज्या फांदीवर तू
आहेस ती फांदीच
"अंध मतदानाने " तोडू नकोस !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा