दिशाहीन
होत ‘चकवा ‘ झालेली
व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याच
ठिकाणी येते तसेच
सरकारचे लॉक डाऊन
बाबत होताना दिसते
आहे . अनलॉकची भाषा
करणाऱ्या सरकारने कोरोना
साथ नियंत्रणासाठी पुन्हा
एकदा लॉक डाऊनची
मात्रा लागू केली
आहे .
स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या काळात ,वेगवेगळ्या पद्धतींने लॉक डाउनची अंमलबजावणी करत असल्यामुळे लॉक डाऊन हा आता जनतेसाठी व्यावसायिकांसाठी , उदयॊगधंदयासाठी 'जाच ' ठरू लागलेला आहे
प्रश्न हा
आहे की , हि
मात्रा प्रभावी ठरेल काय
? कुठलेही औषध 'योग्य
' पद्धतीने घेतले तरच ते
उपयोगी ठरते , लॉक डाऊन
चे देखील तसेच
आहे . कोरोना साथ
नियंत्रणासाठी लॉक डाऊन
उपयोगी ठरण्यासाठी सर्वप्रथम सरकारने
धरसोडवृत्तीचा त्याग करत “झिरो
मुव्हमेंट लॉक
डाऊन “ घेणे आवश्यक
आहे . अर्धवट लॉक
डाऊन केवळ आणि
केवळ यंत्रणेचा अपव्यय
ठरतो हे पहिल्या
४ लॉक डाऊनमधून
अधोरेखित झालेलेच आहे . सरकारने
टाळेबंदीचा 'डोळस
' वापर करायला हवा .
*खरे तर पहिल्या २/३ लॉक डाऊन मध्येच ४/५ दिवसांचे झिरो मूव्हमेंट लॉक डाऊन घ्यायला हवे होते*
" झिरो मुव्हमेंट
लॉक डाऊन " हा कोरोनाची
शृखंला खंडित करण्याचा सर्वोत्तम
मार्ग ठरू शकतो
. सध्याच्या लॉक डाऊन
मध्ये भाजीपाला
खरेदी , फळ खरेदी
-दूध खरेदी , मटण
-चिकन-मासे खरेदीसाठी
प्रत्येक घरातील एक तरी
व्यक्ती बाहेर पडत आहे
. अशा ठिकाणी नाही
म्हणले तरी 'सोशल
डिस्टन्स ' ला हरताळ
फासला जातो आहे
. घरातील एक व्यक्ती
बाहेर पडत असली
तरी त्यामुळे घरातील
अन्य सदस्यांना देखील
धोका आहेच . हे
टाळणे गरजेचे आहे
.
८० टक्के नागरीकांचे
वर्तन जरी संवेदनशील
-जबाबदारीचे भान असणारे
असले तरी २०
टक्के असंवेदनशील -बेजबाबदार
नागरीकांमुळे कोरोनाचा विस्तार होतो
आहे आणि म्हणूनच
सध्या ज्या ज्या
ठिकाणी टाळेबंदी लागू केलेली
आहे तिचे रूपांतर
‘ शून्य हालचाल टाळेबंदी ' करणे
हाच सर्वोत्तम ऊपाय
तूर्त तरी कोरोना
नियंत्रणात आणण्यासाठी दिसतो
आहे .
आजवर
सरकार व सरकारी
यंत्रणा अनेक उपाय
योजतच आहेत पण
कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात
घेता हे उपाय
अधिक प्रभावी व
नाविन्यपूर्ण असायला हवेत . २०-
२२ तास पाळले
जाणाऱ्या साथ सोवळ्यावर केवळ भाजी
-किराणा -दूध यासम खरेदीसाठी
पाणी फेरले
जाणार असेल तर
कोरोनाची श्रुंखला खंडित करणे
दिवास्वप्नच ठरणार हे निश्चित
.
कोरोना अजून किती
काळ राहणार हे
अनिश्चित आहे . हे लक्षात
घेत सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी
सर्वाधिक गर्दी होणाऱ्या भाजीपाला
-फळ वितरण व्यवस्थेचे
विकेंद्रीकरण करणे
अत्यंत आवश्यक आहे . 'होम
डिलिव्हरी ' हि वितरण
व्यवस्था संकल्पना अधिकाधिक प्रमाणात
अन्न -धान्य वितरणाच्या
बाबतीत वापरली तर बऱ्याच
मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रसारावर
अंकुश आणला जाऊ
शकतो . .
अर्थातच
कोरोना प्रसारास कारणीभूत असणारी
दुसरी बाजू म्हणजे नागरिकांचे
बेजबाबदार वर्तन .कोरोनाचा हॉटस्पॉट
असणाऱ्या भागात देखील आपल्या
आयुष्यातील मांसाहार करण्याचा हा
शेवटचा रविवार आहे अशा
थाटातील रांगा , भविष्यात भाजीपाला
मिळणारच नाही अशा
थाटात कोरोना विषाणूला
खिजवित भाजीपाला मार्केटमध्ये होणारी
भाऊ गर्दी 'भारतीय नागरिक नागरिकशास्त्रात
सदैव्य नापासच ' ठरतात याचीच
साक्ष देताना दिसतात
. वाईट याचे वाटते
की अनेक विकसनशील
देशातील कोरोना बळींची संख्या
समोर दिसत असताना
भारतीय नागरीक मात्र अजूनही
गंभीर होताना दिसत
नाहीत .
सारांश हाच
की , जगाला हादरून
टाकणाऱ्या कोरोना संसर्गाचे लोन
भारतात 'कम्युनिटी स्प्रेड ' स्टेजमध्ये
जाऊ द्यायचे नसेल
व भारताची अवस्था
अन्य देशासारखी बिकट
होऊ द्यायची नसेल
तर तर
प्रशासनाने आऊट ऑफ
बॉक्स विचार करत
नाविन्यपूर्ण उपाय योजायला
हवेत व नागरिकांनी
आपल्या बेजबाबदार वृत्तीला वेसण
घालण्याची गरज आहे
. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने
,पालिकांनी सफाई कामगार
, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे
कर्मचारी -अधिकारी व जीवनावश्यक खरेदीसाठी
बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे
निर्जंतुकीकरण करण्यासाठी 'सॅनेटरी व्हॅन'
ची व्यवस्था करायला
हवी .
वेळ
अजूनही हाताबाहेर गेलेली नाही
सरकार व नागरीकांनी वेळीच
जागे होणे गरजेचे
आहे , अन्यथा अनर्थ
अटळ दिसतो .
सुधीर
लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी
मुंबई .
खूप गरज आहे अश्या उपायांची ....सुधीर जी खूप छान analysis केले आहे तुम्ही
उत्तर द्याहटवाहा उपाय अगदी रामबाण ठरेल यात काही शंका वाटत नाही.
उत्तर द्याहटवातुम्ही मांडलेले मुद्दे आगदी 100 % बरोबर ख
उत्तर द्याहटवाआहेत..
खरे आहे सर मी सहमत आहे
उत्तर द्याहटवासरकारसाठी छान प्रबोधनात्मक प्रस्ताव
उत्तर द्याहटवाResponsible citizen, nice
उत्तर द्याहटवाChan sandesh
उत्तर द्याहटवा